ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संकट कायम येतच असतात पण आज याच संकटावर मात करून आम्हीही सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे उद्योगाबरोबरच आपल्याला दोन वेळचं अन्न मिळावं म्हणून जीव पणाला लावणाऱया शेतकऱयांची चुलही पेटली पाहिजे. उद्योगाबरोबरच कृषी क्षेत्रही आपलं प्राधान्य आहे. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना कर्जमुक्त करू अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांना दिली.
मराठवाडय़ातील महाएक्स्पो प्रदर्शनाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱयांना फक्त कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. जागात, देशात मंदी आली म्हणून रडायचं नाही. राज्याला रडायची नाही, तर लढय़ाची गरज आहे. लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
उद्योजकांना प्रेरणा देण्याचे काम सरकार करेल. उद्योजकांच्या काही सूचना असतील तर त्या त्यांनी सरकारलाल पाठवाव्यात. तसेच महिला उद्योजकांना देखील संधी दिली पाहिजे. राज्यात विकासाचा दिवा पेटला पाहिजे. आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ, तुम्ही भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
परदेशी बनावटीचे आकर्षण आता संपले आहे. जगाला ‘मेड इन इंडिया’ ची भुरळ पडली पाहीजे. असंही ते यावेळी म्हणाले.