प्रतिनिधी/ बेळगाव
उद्योग खात्री योजनेतून तालुक्मयातील विविध ठिकाणी कामे सुरु करण्यात आली आहेत. बेळगाव तालुक्मयातील मण्णिकेरी येथे एका उद्योग खात्रीअंतर्गत काम करत असताना त्याच्या बोटावर दगड पडल्याने त्याची दोन बोटे निकामी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. यामुळे त्याला तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले असून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्या कामगाराच्या कुटुंबियांनी केली आहे.
शट्टू लक्ष्मण बुरली (वय 45, रा. केदनूर) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो शुक्रवारी केदनूर येथे उद्योग खात्रीचे काम नसल्यामुळे मण्णिकेरी येथील तलाव खोदाईसाठी गेला होता. त्याठिकाणी सकाळपासून त्याने काम केले. दुपारी अचानक खोद काम करताता एक दगड त्याच्या हातावर कोसळला आणि त्याची दोन बोटे निकामी झाली आहेत. यामुळे एकच गोंधळ उडाला. तातडीने त्याला खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उद्योग खात्री योजनेतून मण्णिकेरी येथे मोठय़ा प्रमाणात तलाव खोदाईचे काम सुरू आहे. त्यामुळे मण्णिकेरी बरोबरच केदनूर, हंदिगनूर व इतर गावातील कामगारांना मण्णिकेरी येथे काम दिले जात आहे. शुक्रवारीही शट्टू हा कामावर गेला असता अचानक त्याच्या हातावर दगड कोसळून त्याची दोन बोटे निकामी झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत तालुका पंचायतचे सहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद यांना माहिती दिली. मात्र त्यांनी जखमीची भेटही घेतली नाही आणि साधी विचारपूसही केली नाही, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. तातडीने संबंधित कामगाराला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.