साधी विचारपूसही न केल्याने कर्मचारी नाराज
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिऱया बंधाऱयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी शहरात रविवारी आले होते. मात्र यावेळी त्यांनी संपकरी एसटी कर्मचाऱयांची भेट घेतली नाह़ी संपावर असलेले कर्मचारी सध्या बिकट परिस्थितीतून जात आहेत़ कर्मचाऱयांचे मृत्यू होत आहेत़ अशा परिस्थितीत शासकीय विश्रामगृहापासून हाकेच्या अंतरावर एसटी कर्मचारी असताना उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची साधी विचारपूस करायला हवी होत़ी, अशी अपेक्षा संपकरी कर्मचाऱयांमधून व्यक्त झाली. तर काहींनी मंत्र्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त केली आह़े
रविवारी राज्यातील मोठे नेते रत्नागिरीत दाखल झाले होत़े यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अनिल परब, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदींचा समावेश होत़ा सर्व मंत्री आरामासाठी माळनाका येथील शासकीय विश्रामगृह याठिकणी थांबले होत़े तर एसटीचे विभागीय कार्यालय देखील याचठिकाणी असल्याने मंत्री आपली भेट घेतील, अशी आशा कर्मचाऱयांना होती. मात्र मंत्र्यांच्या गाडय़ा सायरन वाजवत निघून गेल्याने संपकरी एसटी कर्मचाऱयांचा भ्रमनिरास झाल़ा
रत्नागिरी दौऱयावर आलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी संप मागे न घेतल्यास तीव्र कारवाईचे संकेत दिले आहेत़ एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी 9 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत़ राज्यव्यापी असलेल्या या संपामध्ये रत्नागिरीमधील देखील एसटी कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत़ दीड महिना चालणाऱया या संपामुळे एसटी कर्मचारी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत़ अशा परिस्थितीत शासनाकडून दखल घेण्यात यावी, अशी अपेक्षा या कर्मचाऱयांकडून व्यक्त करण्यात येत होत़ी
600 कर्मचारी कामावर हजर
जिह्यात आता एकूण 600 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात सोमवारी 300 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक, वाहक कामावर हजर रहावेत यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत़ सोमवारी देखील एसटीच्या कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यात आल़ी मात्र कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेच दिसून आल़े
संप मागे न घेतल्यास तीव्र कारवाई –ऍड. अनिल परब
शासनाप्रमाणे एसटी कर्मचारी देखील जनतेला बांधिल आह़े त्यामुळे संप मागे न घेतल्यास तीव्र कारवाई करण्यात येईल़ न्यायालयाने देखील अवमान याचिका प्रत्येक एसटी डेपोबाहेर लावण्यास सांगितली आह़े त्यामुळे न्यायालयाने कारवाई करण्यास एकप्रकारे परवानगी दिली असल्याचे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी रत्नागिरीत बोलताना सांगितल़े