प्रतिनिधी /बेळगाव
बळ्ळारी नाला परिसरातील शेतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ हे त्याची पाहणी करायला येणार आहेत, अशी माहिती शेतकऱयांना मिळाली. त्यामुळे येळ्ळूर रस्त्यावर दुपारपासूनच शेतकरी त्यांची वाट पाहत ताटकळत थांबले होते. मात्र, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ हे तिकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे शेतकरी नाराज होऊन घरी परतले.
बळ्ळारी नाल्यामुळे दरवषीच भात पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी परिसरातील शेकडो एकर जमिनीतील भात पीक कुजून वाया गेले आहे. शेतकऱयांवर दुपार पेरणीचे संकट कोसळले आहे.
त्यामुळे बळीराजा मोठय़ा संकटात सापडला आहे. सरकारकडून काही तरी मदत मिळेल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, अद्याप कोणीच शेतकऱयांच्या या नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी शेतकरी राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी दिवसभर ताटकळत थांबले
होते.