बेंगळूर येथे ‘लसीकरण भारत कार्यक्रमाला’ उपस्थिती
बेंगळूर/प्रतिनिधी
उपराष्ट्रपती नायडू यांनी बेंगळूर येथील लसीकरण भारत कार्यक्रमालाहजेरी लावली. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना नायडूंनी लोकांना चांगले आरोग्य राखण्यासाठी जंक फूड टाळा आणि पारंपारिक भारतीय खाद्यपदार्थ खा असे आवाहन केलं. तसेच त्यांनी कोरोना अजून संपलेला नाही असा इशाराही त्यांनी दिला आणि लोकांच्या सहकार्याशिवाय सरकारचे कामकाज यशस्वी होणार नाही असे त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी, आमच्याकडे लसी आहेत, लसींची कमतरता नाही, आणि जर गरज असेल तर, मुख्यमंत्री नमूद करत असताना, मी त्यांना आधीच सांगितले आहे की मी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलून तुम्हाला पुरेशी लस देईन,’ असे वृत्त पीटीआयने म्हटले आहे.