अधिकाऱयांना केल्या सूचना ः जिल्हा पंचायतमध्ये बैठक
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिह्यामध्ये पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास झाला आहे. यातच कोरोनासारख्या आजाराला झुंज देताना मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता तिसऱया लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्याचा थेट मुलांवर परिणाम होणार आहे. तेव्हा कोरोना आणि पुराच्या संकटात सापडलेल्या जनतेला सहकार्य करण्यासाठी आता अधिकाऱयांनीच परिश्रम घ्यावेत, अशी सूचना उपलोकायुक्त बी. एस. पाटील यांनी केली.
जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी व्यवस्थापनाबाबत अधिकाऱयांना सूचना केल्या. बेळगाव जिल्हा सीमाभागामध्ये वसलेला आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमा या जिह्याला लागल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. एकाच वेळी कोरोना आणि पुराचे संकट साऱयांवर आले आहे. तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी सर्वांनीच सज्ज होणे गरजेचे आहे.
कोरोना किंवा पुराचे संकट हे नेहमीच येत आहे. कोरोना तसेच पुराविरोधात लढण्याची मानसिकता प्रत्येकानेच ठेवावी. जागरुकतेने याचा लढा द्या, कोरोनाने साऱयांनाच धडा शिकविला आहे. या महाभयंकर आजारामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. हा साऱयांनाच एक धडा आहे. तेव्हा यातून आपण सर्वांनी शिकण्याची गरज आहे.
कोविडबाबत जनजागृती महत्त्वाची
कोविडबाबत जनजागृतीही अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण भागामध्ये याची अधिक जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी पीडीओ, आशा कार्यकर्त्या, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच इतर टास्क फोर्सने लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, असे सांगण्यात आले.
जिल्हा पंचायत तसेच तालुका पंचायतने स्वच्छता व मुलांच्या आरोग्याविषयी ग्रामीण पातळीवर कार्यशाळांचे आयोजन करावे. सीमाभागामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य व कठोर उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
जनतेला तातडीने नुकसानभरपाई द्या
या पुरामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. अनेकांची जनावरेही दगावली आहेत. पिकेही गेली आहेत. तेव्हा त्यांना वेळेत अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे काम करावे, याचबरोबर भविष्यात असा फटका बसू नये यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छतागृहांचा वापर महत्त्वाचा
अनेक गावे हागणदारीमुक्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अजूनही काही गावांमध्ये शौचालये उपलब्ध झाली नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा प्रत्येक गावामध्ये जाऊन त्याची माहिती संग्रहीत करून त्या ठिकाणी शौचालये तसेच स्वच्छतागृहे बांधून त्यांचा वापर करण्याबाबत नागरिकांना सक्त ताकीद करावी, असेही त्यांनी सांगितले.
तलाव, जलाशय व वनक्षेत्रांचे संवर्धन महत्त्वाचे
तलाव, कालवे, वनक्षेत्र आणि वन्यप्राणी तसेच जलाशये हा देशाचा खजिना आहे. पुढील पिढीसाठी हे महत्त्वाचे आहे. तेव्हा तलावांचा विस्तार, नवीत तलाव, वृक्षारोपण करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलून या सर्वांचेच संवर्धन करावे, असे त्यांनी सांगितले.
जनतेची काळजी घ्या, त्यांचा आदर करा
सर्वसामान्य जनतेची प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जनतेची काळजी घेण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचाऱयांची नियुक्ती केली जाते. मात्र, याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी लोकांची काळजी घ्या, त्यांचा आदर करा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकायुक्त सदैव तत्पर
भ्रष्टाचार रोखण्यासाठीच लोकायुक्त या संस्थेची स्थापना झाली. भ्रष्टाचार रोखणे व स्वच्छ प्रशासन ठेवणे हेच लोकायुक्तांचे कार्य आहे. त्यामुळे लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची माहिती आणि पुरावे दिल्यास नक्कीच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिह्याला आलेल्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती दिली. कोरोनाबाबतही दक्षता घेतली गेली आहे. नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर आरटीजीएस पद्धतीने रक्कम जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातून येणाऱया व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. त्या पद्धतीने काटेकोरपणे तपासणी केली जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.