प्रतिनिधी / वैराग
उपळे दुमाला तालुका बार्शी येथील पूर्ववैमनस्यातून व शेतीच्या कारणावरून दोन गटात तलवार कोयता काठी व दगडाने जबर हाणामारी झाल्याने दोन्ही गटांनी परस्पर विरोधी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की याबाबत अधिक फिर्यादी किशोर काशिनाथ साळुंके व त्याचे दाजी अमोल शत्रुघन तांबारे, रणजीत तांबारे, हे आज सकाळी दहाच्या सुमारास शेताकडे जात असताना मुंगशी झाडी चौकात दिनेश रामलिंग साळुंखे, दादाराव रामलिंग साळुंखे, दशरथ रामलिंग साळुंखे, रामलिंग त्रिंबक साळुंखे यांनी तलवार कोयता व काठीने मारहाण केली.
तर मंगल रामलिंग साळुंखे, सोनाली दादाराव साळुंखे व अश्विनी दिनेश साळुंखे सर्व रा. उपळे दुमाला (ता. बार्शी ) यांनी दगडाने मारहाण केली. असल्याची फिर्याद किशोर काशिनाथ साळुंके यांनी वैराग पोलिसात दिली आहे.
तसेच तुमची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली म्हणून चिडून जाऊन अमोल शत्रुघन तांबारे, किशोर काशिनाथ साळुंके, रणजीत शिवाजी तांबारे, तानाजी हरिबा तांबारे, लक्ष्मण राजेभाऊ तांबारे, अमोल आनंता नाईकवाडी, पांडुरंग अण्णा नाईकवाडी यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार कोयता काठी व दगडाने मारहाण केल्या बाबतची तक्रार दिनेश रामलिंग साळुंखे यांनी वैराग पोलिसात दिली आहे. अधिक वरील घटनेचा तपास पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र राठोड करीत आहेत .