प्रतिनिधी/ रत्नागिरी
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱया कर्मचाऱयांना अचानक सप्टेंबर 2020 च्या पत्रान्वये पुर्ननियुक्ती यांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करण्याबाबतचा निर्णय रद्द होण्याकरिता वांरवार निवेदन देऊनही याबाबत आवश्यक ती दखल शासनाकडून घेण्यात आलेली नाही. हि बाब खेदपूर्ण व अन्यायकारक असल्याने गुरूवार 5 नोव्हेंबरपासून या कर्मचाऱयांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
सध्यस्थितीत राज्यभरातील 500 हुन अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली आहे. उर्वरित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत हि नजीकच्या काळात हीच वेळ येण्याची शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी जिह्यामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत अभियानामध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यंत्रणेचाबत उमेद- HSRLM, प्रामविकास विभाग , महराष्ट्र शासन यांनी अवलंबिलेले धेरण पाहता उमेद अभियानाचे मागिल 4 वर्षांहून अधिक काळ उभे राहिलेले काम अभियानाचा मूळ उद्देश पूर्ण होण्याच्या अगोदरच उष्ण होण्याचे दाट संकेत येणार आहे.
मागील 6 महिन्याहून अधिक काळ कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांनी आपले रोजगार गमावलेले असताना उमेद मधून उभी राहिलेली आर्थीक विकासाची चळवळ या कुटुंबांना आधार देत आली आहे. परंतु आता मात्र हि चळवळ उभारणाऱया अधिकारी व कर्मचारी यांची सेवाच संपुष्टात आली असून त्यांच्या स्वतःच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाचा हा निर्णय अभियानामध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी- त्यांच्यावर अन्यायकारक तर आहेच परंतु सोबतच ग्रामीण भागातील कुटुंबाचे गोधनमान सुधारणेसाठी उभी राहिलेली स्वयंसहायता समूहाची चळवळ थांबून गरीब, गरजू कुटुंबाना पून्हा आर्थीक व सामाजिक दृष्टय़ा मागे नेणारा आहे.
शासन स्तरावरून यावर विचार होणे आवश्यक असून तसे न झाल्यास उमेद अभियानातून गरिबी निर्मुलनासाठी उभे राहिलेले काम पाजून पुढील कामाची वाटचाल रोखली जाणार आहे. यानुसार दिनांक 10 सप्टेंबर रोजीचा अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करण्याबाबतचा निर्णय रद्द होण्याकरिता वांरवार निवेदन देऊनही याबाबत आवश्यक ती दखल घेण्यात आलेली नाही. हि बाब खेदपूर्ण व अन्यायकारक आहे. यानुसार उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्यापर्यंत घेण्यात आलेला निर्णय अन्यायकारक आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्याचे अनुषंगाने राज्यभरातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी सनदशीर असहकार आंदोलन केले होते. परंतु या आंदोलनाची शासन स्तरावरून उमेद, ग्रामविकास विभाग, महराष्ट्र शासन यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे उमेद- अंतर्गत कार्यरत राज्य भरातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आमच्यावर होणाऱया अन्यायाबाबत महराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 5 नोव्हेंबरपासून पुन्हा सनदशीर मार्गाने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होणेसाठी जिल्ह्य़ातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी अन्यायाबाबत सनदशीर मार्गाने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शासन स्तरावरून आवश्यकती दखल घेवून आम्हास न्याय द्यावा अशी मागणी विक्रम बाळासाहेब सरगर (अध्यक्ष) रत्नागिरी कर्मचारी कल्याणकारी मंडळ, जि.रत्नागिरी द्वारे करण्यात येत आहे.