सातारा/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी योजनेत सहभागी नसणारे उर्वरित सर्व केशरी कार्डधारकांना मे व जून या महिन्याकरिता १ ते १०तारखे दरम्यान गहू व तांदूळ याचे वाटप सर्व रेशन दुकानामधुन करण्यात येणार आहे, अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सध्या
काही दुकानातुन वाटप सुरु आहे.
मे महिन्याचे वाटप मे मध्ये व जून महिन्याचे वाटप जून मध्ये होणार आहे. गहूप्रती व्यक्ती किलोरुपये ८ प्रती किलो व तांदूळ प्रती व्यक्ती २ किलो रुपये १२प्रती किलो या दराने व प्रमाणानुसार मिळणार आहे. सदरचे धान्य ज्या रेशन दुकानात कार्डधारकाची नोंद आहे त्याच दुकानात मिळणार आहे. इतर दुकानात मिळणार नाही.यासाठी त्या कार्डधारकाने अगर कुटुंबातील व्यक्तीने मुळ शिधापत्रिका त्या दुकानात संबंधित दुकानदाराकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. कार्डामध्ये नांव नसणाऱ्या व्यक्तीस धान्य मिळणार नाही. रेशन घेण्यासाठी येताना कार्डधारकाने तोंडाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच दुकानामध्ये व दुकानाचे बाहेर ग्राहकांनी १ मिटर अंतर ठेऊन (सोशल डिस्टनसिंग पाळावे) रांगेत उभे राहवे. धान्य प्रमाण व दराबाबत काही शंका असल्यास दुकानदार किंवा ग्रामस्तरीय समिती सदस्य यांचे कडून मार्गदर्शन घ्यावे. मुळ शिधापत्रिका नसलेस त्या व्यक्तीस धान्य देता येणार नाही. तक्रार असल्यास हेल्पलाईन क्र. १०७७ वर संपर्क साधावा. रेशन दुकानदार व लाभार्थी ग्राहक यांनी सामंजस्याची भुमिका घ्यावी. प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील
लाभार्थ्यांना ११ ते १८ तारखे दरम्यान धान्य वाटप करणेत येणार आहे.
यामुळे सर्व कार्डधारकांची एकाच वेळेस दुकानात गर्दी होणार नाही, तरी ग्राहकांनी दुकानदारांना सहकार्य करावे. आम्ही रेशन दुकानदार ग्राहकांच्या सेवेसाठीच आपला जीव धोक्यात घालून धान्य वाटप करीत आहोत. तरी ग्राहकांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे, सुचनांचे पालन करुन सर्व दुकानदारांना सहकार्य करावे, असे आवाहन रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केले आहे.