प्रतिनिधी / बेळगाव
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीवर तीनवेळा निवडून आल्याबद्दल यल्लाप्पा पाटील यांचा उषःकाल मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब काकतकर म्हणाले, यल्लाप्पा पाटील हे तीनवेळा ग्राम पंचायतीवर निवडून आले आहेत. त्यांनी गावचा विकास करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचीच ही पोचपावती आहे. त्यांच्या पुढील कार्यास यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
सूत्रसंचालन नारायण किटवाडकर यांनी केले. सुहास किल्लेकर यांनी आभार मानले. यावेळी काका तेंडोलकर, विनायक कंग्राळकर, अरुण चव्हाण, शिवाजी हंडे, गणेश बिच्चू, महेश हणमशेट, आप्पा शेणवे, मिलिंद देशपांडे, श्रीकांत देसाई, राहुल जमनानी, दत्ता तेलंग आदी उपस्थित होते.