385 पैकी 140 ग्रामपंचायतवर भाजप प्रणित पॅनलचे वर्चस्व
प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्हयात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत एकूण 385 ग्रामपंचायत पैकी भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनलने जिल्हयातील 140 ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. भारतीय जनता पार्टीचे आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंहजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेतेमंडळींनी पुर्ण ताकतीनिशी जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूका लढविल्या होत्या. राज्याप्रमाणेच जिल्हयामध्ये महाविकास आघाडी पॅटर्न निर्माण करून तिन्ही पक्षांनी एकत्रित सदरच्या ग्रामपंचायती लढविल्या होत्या. तरी ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विकासाच्या दिशेने जाण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील जनतेने भरघोस पाठींबा भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनलच्या पाठीमागे उभा केलेला दिसून आला. या अटीतटीच्या निवडणूकीमध्ये 140 ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनल विजयी झाला आहे.
तालुकानिहाय निकाल असा :
उस्मानाबाद तालुका
एकूण – 66
बिनविरोध- 3
भाजपा – 37
कळंब तालुका
एकूण – 59
बिनविरोध- 6
भाजपा – 33
तुळजापूर तालुका
एकूण – 53
बिनविरोध- 4
भाजपा – 26
परांडा तालुका
एकूण – 70
बिनविरोध- 5
भाजपा – 27
लोहारा तालुका
एकूण – 26
बिनविरोध- 5
भाजपा – 2
उमरगा तालुका
एकूण – 49
बिनविरोध- 11
भाजपा – 10
वाशी तालुका
एकूण – 34
बिनविरोध- 1
भाजपा – 4
भूम तालुका
एकूण – 71
बिनविरोध- 5
भाजपा – 6