वार्ताहर /कुद्रेमनी
बेळगाव तालुक्मयाच्या पश्चिम भागात यंदाच्या सुगी हंगामास सुरुवात झाली असून कामाच्या घाईत शेतकरीवर्ग दिसून येत आहे. भातकापणी, मळणी, रताळी काढणे, ऊसतोडणी अशी कामे करण्याची सध्या धांदल सुरू आहे.
सध्या या भागातील विविध ठिकाणी असलेल्या ऊस मळय़ांमध्ये म्हाळुंगे, राजगोळी हेमरस साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी कामगारांबरोबरच गावागावांमध्येही ऊसतोडणीसाठी शेतकऱयांच्या टोळय़ा कार्यरत झाल्या आहेत. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ऊस वाहतुकीची वाहने काही ठिकाणी पोहोचत नाहीत अशा ठिकाणी उसाची उचल उशिरा होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. ऊस तोडणीकरिता विविध साखर कारखान्यांच्या कार्यालयांकडे नावनोंदणीसाठी शेतकरी धावपळ करीत असताना दिसत आहे. काही कारखान्यांनी कमी क्षेत्रात जास्त ऊस उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना बक्षिसे ठेवल्याचे ऊसतोडणी कामगारांकडून सांगितले जाते. म्हाळुंगे साखर कारखान्याने गटानुसार बक्षिसे ठेवली आहेत. कुदेमनी येथील संतोष गावडू पाटील यांच्या ऊसमळय़ाची स्पर्धेसाठी निवड करून तोडणी सुरू आहे. सध्या ऊसदर प्रतिटन रु. 2900 ते 2950 पर्यंत मिळेल. मात्र हा दर परवडणारा नसून अधिक दर मिळाला तर ऊसपीक परवडणारे असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.
उष्णता नसल्याने रताळी पीक उत्पादनात घट
दरवषीच्या तुलनेत यंदा रताळी उत्पादनाचे प्रमाण अत्यल्प असल्याने नुकसानीचा फटका बसणार आहे. यंदा अधिक पावसाळी वातावरणामुळे रताळी पिकाला म्हणावी तशी उष्णता नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. कुदेमनी ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी आपल्या शेतातील शंभर पोती रताळी काढली. हा सध्या गावात कुतूहलाचा विषय ठरला आहे.
शिवारातील पाणी बाहेर काढण्याची वेळ
माळ शेतवडीत भातकापणी, मळणीची कामे सर्वत्र सुरू आहेत. मात्र, पाणथळ शिवारातील भातशेतांमध्ये अद्यापही पाणी आहे. शिवारातील पाणी बाहेर काढून भातकापणी करण्यासाठी शेतकऱयांना कसरत करावी लागणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.