वार्ताहर/ मडकई
संजीवनी साखर कारखान्याच्या शेतकऱयांना ऊस उत्पादनावरील थकीत रक्कम सरकारने त्वरीत चुकती करावी. तसेच संजीवनीसंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पृषीमंत्री बाबू कवळेकर यांना विश्वासात घेऊन साखर कारखान्यासंबंधी ठोस निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. भाजपाचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही तसा शब्द दिला होता, असे ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी साखर कारखान्याच्या भवितव्याविषयी आपण चर्चा केली होते. तत्कालीन कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनाही त्याची कल्पना आहे. त्यावेळी केंद्रीय कृषी खात्यामार्फत रु. 100 कोटींचा निधी देण्याचे मान्य केले होते. केंद्राकडून 60 टक्के तर गोवा सरकारकडून 40 टक्के वाटा या तत्वावर हा कारखाना चालवावा, असे ठरले होते. हा विषय भाजपाचे अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांच्या कानावर आपण घातला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सावंत यांनी साखर कारखाना, कर्मचारी व शेतकऱयांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते, असे ढवळीकर यांनी सांगितले.
वाढदिनी फ्लेवर्ड मिल्क मोफत नेणाऱया आमदारांची नावे जाहीर करा
गोवा डेअरीतून फ्लेवर्ड मिल्क फुकटात काही आमदारांच्या वाढदिनी पुरविले जात होते. यापुढे ते बंद करण्याचे गोवा डेअरीने जाहीर केले आहे. डेअरीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांच्या या निर्णयाचे ढवळीकर यांनी स्वागत केले आहे. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ज्या आमदारांनी आपल्या वाढदिनी फ्लेवर्ड मिल्क फुकटात नेले त्याची नावे व रक्कम डेअरीने जाहीर करावी. शाळा, क्रीडा महोत्सव किंवा इतर समाजोपयोगी कारणासाठी ते पुरविले असल्यास ते माफ करावे, अशी मागणी ढवळीकर यांनी केली.
शेतकऱयांना नुकसान भरपाई द्या
नैसर्गिक आपत्तीमुळे शेती अडचणीत आलेल्या नुकसानग्रस्थ शेतकऱयांना भरपाई देण्याची मागणीही आमदार ढवळीकर यांनी केली आहे. गेल्या पावसात बंधाऱयाला भगदाड पडल्याने कुंडई, मडकई, सावर्डे, सांगे, डिचोली अशा अनेक तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे अनेक शेतकऱयांना आर्थिक फटका बसला होता. कृषी खात्यातील ज्या अधिकाऱयांनी या नुकसानीची पाहणी करण्यास दिरगांई केली, अशा अधिकाऱयांवर कारवाई करावी. भात शेतीबरोबरच वादळी वाऱयात ज्या बागायतदारांचे नुकसान झाले त्यांनाही कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी खात्यामार्फत नुकसान भरपाई देण्याची मागणी ढवळीकर यांनी केली आहे.
पाच दिवसांचे अधिवेशन घ्याच
राज्यसभा व लोकसभेचे अधिवेशन पंधरा दिवस चालणार आहे. गोव्यातील सर्व सीमा खुल्या करण्यात आल्याने पर्यटनाशी निगडीत रेस्टोरंट, हॉटेल्स व इतर व्यवसाय सुरु झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत कोरानाचे कारण पुढे करुन पाच दिवशीय अधिवेशन घेण्यास तयार नाहीत. मागच्या एक दिवशीय अधिवेशनात पर्यांवरण, अर्थसंकल्प व कोरोना या महत्त्वाच्या तीन विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. मुख्यमंत्री व सभापतींनी ती होऊ न देता अधिवेशन दुपारपर्यंत गुंडाळले. राज्याच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले अर्थसंकल्प, कोरोना, आरोग्यसेवा, खाण व्यवसाय, पर्यावरण व म्हादई या ज्वलंत प्रश्नावर या पाच दिवशीय अधिवेशनात चर्चा होणे गरजेचे आहे, असे ढवळीकर म्हणाले.
21 सप्टेंबरनतंर शाळा विद्यालये सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्यास ती, &ंसुरू करावीत. मात्र सामाजिक अंतर व इतर नियंमांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे. नर्सिंग कोर्स केलेल्या मुलींकडून विद्यार्थ्यांचे ऑक्सिजन, ग्लुकोमिटर ठेवून चाचणी करण्याची सोय करता येईल. आठवडय़ातून दोनवेळा अशी तपासणी करण्याची सूचना त्यांनी केली.
कारोनामुळे बळींचा आकडा वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी हा मृत्यूदर शुन्यावर आणणार असे जाहीर केले आहे. मात्र नुसती आश्वासने नकोत ठोस कृती हवी. त्यासाठी आरोग्य यंत्रणा व पुरेशी औषधी उपलब्ध करा, अशी मागणीही त्यांनी केली. मडकई मतदार संघातील विविध पंचायतीमध्ये तिसऱया टप्प्यात रोग प्रतिकार शक्तीवर्धक औषधे वाटण्याची मोहीम सुरु आहे. ज्या लोकांना अद्याप ही औषधे मिळाली नाहीत, त्यांनी मगोचे युवा नेते मिथील ढवळीकर, मिलींद सावईकर व साई नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.