जिल्हाधिकारी बजावणार नोटीस
बेळगाव / प्रतिनिधी
साखर कारखाने सुरू करण्यापूर्वी ऊस दर जाहीर करावेत, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. दर जाहीर केल्यानंतरच कारखाने सुरू करावेत, असेही निवेदनात म्हटले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी शुक्रवारी बैठक घेऊन साखर कारखान्यांना याबाबत नोटीस बजावली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी एम. जी. हिरेमठ यांनी शेतकऱयांना दिले आहे.
शेतकरी नेत्यांची तसेच शेतकऱयांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हे आश्वासन दिले आहे. यावेळी साखर कारखान्यांनी 14 दिवसांच्या आत बिले जमा करावीत अशी मागणी देखील केली. प्रत्य़ेक साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावे, असेही देखील शेतकऱयांनी सांगितले. ऊस वजन काटा आणि साखरेच्या उताऱयावर देखील लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले. ऊस तोडणी, वाहतूक खर्च देखील साखर कारखान्यांनी जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सर्व नियमांचे पालन केले जाईल, साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्यावरच साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जि. पं. मुख्यकार्यकारी अधिकारी दर्शन के. व्ही, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहाय्यक संचालक कोडली, शेतकरी संघटनेचे नेते शशिकांत जोशी, चुन्नाप्पा पुजारी, रवि सिध्दण्णावर, सुरेश चौगुले, जयश्री गुरण्णावर, आण्णासाहेब आवटी, प्रकाश नाईक, अशोक यमकणमर्डी, राम गोपाळ पाटील, अमित संगपाळ यासह शेतकरी उपस्थित होते.