मिरपूर/ वृत्तसंस्था
सध्या बांगलादेश आणि भारत यांच्यात बांगलादेशमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतची निवड करण्यात आली होती. दरम्यान बीसीसीआयने पंतची या मालिकेतून मुक्तता केली आहे.
बांगलादेशमधील सुरु असलेल्या या मालिकेसाठी आता पंतच्या जागी दुसरा बदली खेळाडू उपलब्ध करण्यात येणार नाही. पंतने बीसीसीआयच्या वरिष्ठांशी चर्चा केली. आगामी होणाऱया भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसाठी पंतला वनडे मालिकेतून मुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱयात तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.