मागील काही महिन्यांमध्ये कर्मचाऱयांचा राजीनामा सत्र
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही महिन्यांपासून ऍक्सिस बँकेतील जवळपास 15 हजार कर्मचाऱयांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्यांमध्ये मध्यम आणि विविध शाखांमधील कर्मचाऱयांचा समावेश आहे. बँकेतील व्यवस्थापनातील बदल नवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या कामाच्या पद्धती यांना सामोरे जाण्याची तयारी नसल्यामुळे अधिकच्या कर्मचाऱयांनी बँकेला रामराम दिला असल्याचे बँकेतील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले आहे.
मध्यम वर्गातील कर्मचाऱयांचा संबंध हा थेट ग्राहकांसोबत होत असतो. त्यामुळे इतक्या जादा प्रमाणात कर्मचाऱयांनी नोकरी सोडल्याचा परिणाम बँकेतील कामकाजावर होणार असल्याचे म्हटले आहे. याच कारणांमुळे आतापर्यंत 28 हजार जणांना कामांवर नियुक्त केले आहे. तर चालू तिमाहीत 4 हजार जणांना नवीन नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. आगामी दोन वर्षात 30 हजार कर्मचारी घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.