जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिह्यामध्ये ऍग्रीगोल्ड या संस्थेने सर्वसामान्य जनतेचा पैसा गुंतवून घेतला होता. या संस्थेने बरीच वर्षे जिह्यामध्ये आपला व्यवसाय केला. त्यावर विश्वास ठेवून आम्ही एजंट लोक जनतेचे पैसे जमा करून या संस्थेमध्ये भरले. मात्र 2015 पासून भरलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे ग्राहक एजंटांच्या घरी धाव घेत आहेत. यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. आम्हाला दयामरण द्या, अन्यथा संबंधित संस्थेंची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना रक्कम परत द्या, अशी मागणी ऍग्रीगोल्ड कस्टमर आणि एजंट वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ऍग्रीगोल्ड या संस्थेने 1995 ला बेळगावात व जिह्यामध्ये संस्था सुरू केल्या. त्यामध्ये अनेकांनी पैसे गुंतविले. 8 लाख 50 हजार ग्राहक होते. त्यांनी रक्कम मोठय़ा प्रमाणात गुंतविली. आरडी, एफडी आणि पिग्मीच्या स्वरुपात ही रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही ग्राहकांना रक्कमच मिळाली नाही. या संस्थेचे मोठय़ा प्रमाणात मालमत्ता आहे. तेंव्हा ती मालमत्ता विकून पैसे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी के. गुरुमूर्ती, डी. ए. इमरापुरा, के. सोमशेखर, नागभूषण राव, एस. डी. हरभर यांच्यासह एजंट उपस्थित होते..