अभियंता दिलीप चिद्रे यांच्याशिवाय आता कोणी पालिकेत सक्षम नाही
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या सभेत आरोग्य विभागावर मोठया प्रमाणावर आरोप झाले. तर गेल्या सतरा महिन्यामध्ये आरोग्य विभाग सातत्याने गाजत आहे. सोमवारपर्यत आरोग्य विभागाला कारभारी देवू अशी ग्वाही ऍड. दत्तात्रय बनकर यांनी सभागृहात दिली गेली आहे. त्यामुळे सभागृहामध्ये दिलेल्या शब्दानुसार ऍड. बनकर हे कोणाच्या गळय़ात आरोग्याची माळ घालणार?, सक्षम आणि पट्टीतील अधिकारी म्हणून फक्त अभियंता दिलीप चिद्रे हेच उरले आहेत. त्यांच्याच नावाची सध्या चर्चा सुरु आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या सोळा महिन्यामध्ये अनेक लडतरी झाल्या आहेत. त्यातील काही लडतरी अजून वाढणार आहेत. अगदी ईडीपर्यंत ते प्रकरण जाणार आहे. आरोग्य विभाग ही शहराला स्वच्छ आणि सुविधा देणारा विभाग आहे. मात्र, याच विभागामध्ये मलई खाण्याच्या नादात कारभाराची एwसीतैसी झाली. आरोग्य विभाग हा तर महत्वाचा विभाग असून या विभागामध्ये नेंत्यांनी मोठया विश्वासाने पुन्हा ज्यांच्याकडे पद होते त्यांच्याकडेच पदभार सोपवला गेला आहे. कारभारी चांगला असता तर अशा उचापती झाल्या नसत्या. त्या उचापती थांबवता आल्या असत्या परंतु आपल्याच नातेवाईकांना खातेप्रमुख म्हणून आणून आगीत तेल ओतून भडका करण्याचे काम झाले. त्यामुळे काम सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत गेले. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी अनेकदा बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजे तीन आरोग्य निरीक्षक केडरचे आणले. परंतु आरोग्य विभागाचा बिघडलेला कारभार हा काही सुधारण्याचे नाव घेईना. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सभेत अगदी आरोग्य विभागाचा कचराच काढला. त्यावेळी आरोग्य विभागाला प्रमुख नसल्याची बाब समोर येताच बनकर यांनी सोमवारपर्यंत आरोग्य विभागाला प्रमुख देवू असे जाहीर केले. दरम्यान, आरोग्य विभागाचे असलेले प्रमुख शैलेश आष्टेकर यांनी बदली मागवून घेतली. तर आता बनकर यांची कोणत्या अधिकाऱयावर खपामर्जी होणार?, कोणाला मिळणार पदभार असा प्रश्न उपस्थित होत असून यामध्ये अभियंता दिलीप चिद्रे यांच्याच गळय़ात ते माळ टाकणार असल्याची खात्रीशिर वृत्त आहे. कारण एकमेव तेवढाच माणूस आता होला हो करतो बाकी असलेले अधिकारी हे जरा भितभितच काम करतात अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सोमवारी नेमका कोणाला कारभारी बनवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.