व्होडाफोन आयडीआयने 19 महिन्यात गमावले 11.613 कोटी ग्राहक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर अन्य दूरसंचार कंपन्यांचे गणित कोलमडल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्याच्या चढाओढीत मागील दोन वर्षाच्याही कमी कालावधीत व्होडाफोन आयडियाने जवळपास 11.613 कोटी ग्राहकांना गमावले आहेत. 32.5 कोटी ग्राहकाच्या मदतीने कंपनी तिसऱया स्थानी आहे. याच कालावधीत रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांच्या मदतीने आपला पाया भक्कम केला असून भारती एअरटेल आपली बाजारातील हिस्सेदारी कायम राखण्यात यशस्वी झाली आहे.
बीएसएनएलचा वायरलेस सब्सक्राइबर बेस ऑगस्ट 2018 मध्ये 11.358 कोटी होती. तर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरचा 31 ऑगस्टमध्ये भागीदारी केली याच्या जोरावर संयुक्तपणे ग्राहकांची जुळवणी 44.165 कोटी वर गेली होती. यावेळी एअरटेलची ग्राहक संख्या 34.588 कोटी होती तर रिलायन्स जिओचा आकडा 23.923 कोटी राहिला असल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय) यांनी दिली आहे.
बदलेली बाजारातील स्थिती
वरील आकडेवारी पाहिल्यास आता 19 महिन्यांच्या कालावधीनंतर फेब्रुवारी 2020 पर्यंत रिलायन्स जिओने 32.99 टक्के वायरलेस बाजाराची हिस्सेदारी प्राप्त केली आहे. त्यापाठोपाठ एअरटेल 28.35 टक्के आणि व्होडाफोन आयडियाचा प्रवास 28.05 टक्क्मयांच्या घरात पोहोचला आहे. मात्र बीएसएनएलची हिस्सेदारी वधारुन 10.32 टक्क्मयांवर गेली आहे. या कामगिरीच्या जोरावर रिलायन्स जिओने 62.5 लाख वायरलेस ग्राहक आणि एअरटेलनेने 922,946 ग्राहक जोडले आहेत.
आगामी काळातील धोके आणि बदलती स्थिती लक्षात घेत दूरसंचार कंपन्या आपल्या कार्यप्रणालीत मोठय़ा प्रमाणात बदल करीत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. परंतु यांच्यासाठी कोविडच्या संकटामुळे आणखीन अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.