मुंबई :
भारतीय हवाई उद्योगातील मोठी कंपनी एअर इंडियाने अचानकपणे 50 पायलटस्ना कामावरून काढले असल्याची बातमी समोर आली आहे. आता याप्रश्नी व्यवस्थापनाने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत असल्याचे समजते. सेवा नियमांच्या उल्लंघनाच्या कारणास्तव 50 जणांना कामावरून कमी करण्यात आल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर इंडियन कमर्शियल पायलटस् असोसिएशनने याप्रकरणी एअर इंडियाचे अध्यक्ष राजीव बन्सल यांना सविस्तर पत्र लिहले आहे. सध्याच्या महामारीच्या काळात राष्ट्राची सेवा करणाऱयांना याने धक्का बसला आहे.