ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरू करण्याची तयारी एअर इंडियाने सुरू केली आहे. तसेच 4 मे पासूनच्या देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. एअर इंडियाने आपल्या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 3 मे ला हा लॉकडाऊन संपणार आहे. त्यामुळे एअर इंडियाने लॉकडाऊन नंतरच्या विमानप्रवासाची बुकिंग सुरू केली आहे. 4 मेपासून काही ठराविक मार्गावर आणि 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीचे तिकीट बुकिंग एअर इंडियाने सुरू केले आहे.