सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण : केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एअर इंडिया ही आता अधिकृतरित्या टाटा समूहाची कंपनी झाली आहे. एकर इंडिया एक्स्प्रेस या कंपनीचेही हस्तांतरण झाले आहे. केंद्र सरकारने या कंपन्यांमील आपले 100 टक्के समभाग टाटा उद्योगसमूहाच्या स्वामित्वातील उपकंपनी टालेसी प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरीत केले आहेत. तसेच कंपनीचे संपूर्ण व्यवस्थापकीय नियंत्रणही टाटांकडे देण्यात आले आहे. अशा प्रकारे भारतासह जगात प्रसिद्ध असलेला ‘महाराजा3 आता पुन्हा टाटांकडे गेला आहे.
टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या हस्तांतरणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. 69 वर्षांपूर्वी याच दिवशी टाटांची विमान कंपनी सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली होती. केंद्र सरकारने या कंपनीतील आपली धोरणात्मक निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे गुरुवारी या कंपनीचे टाटांकडे अधिकृत हस्तांतरण करण्यात आले आहे, असे केंद्र सरकारने घोषित केले. टाटा समूहाने या निर्णयाचे स्वागत पेले आहे.
एअर इंडिया या कंपनीला टाटा समूहात घेताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कंपनीतील सर्वांशी सहकार्य करुन कंपनीला विश्वविख्यात बनविण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करु. कंपनीचे व्यवस्थापनही आता आमच्या हाती आले आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन कंपनीची भरभराट करण्याचा प्रयत्न आम्ही करु, अशी प्रतिक्रिया टाटा समूहाचे गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापन सचिव तुहिन कांत पांडे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली. त्यांनी सरकारचे आभारही मानले आहेत.
केंद्रीय प्रवासी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी कंपनीच्या नव्या मालकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या मालकांच्या नेतृत्वात कंपनी नवी भरारी घेईल. यामुळे भारतातील प्रवासी विमान वाहतूक उद्योगाला मोठे बळ मिळेल, असा संदेश सिंदिया यांनी ट्विटरवरुन प्रसारित केला आहे.
नव्या योजना, घोषणा
कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर टाटा उद्योगसमूहाने अनेक योजना आणि सुधारणांची घोषणा केली. विमाने सुटण्याची वेळ अचूकपणे पाळणे हा सुधारणेचा प्रारंभ असेल. प्रवाशांना ग्राहक न समजता अतिथी मानले जाईल, तसेच विमानात कर्मचाऱयांकडून त्यांना अशाच प्रकारे उल्लेखिले जाईल. समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्याकडून त्यांना विशेष संदेश पाठविला जाईल. तसेच प्रवास करणाऱयांसाठी विशेष भोजन सेवा टप्प्याटप्प्याने सुरु होईल, असे समूहाने स्पष्ट केले आहे.
सूचनांचा ओघ
टाटांकडे कंपनीचे स्वामित्व गेल्यानंतर आता लोकांनीही ‘महाराजा’ ची प्रकृती सुधारावी म्हणून अनेक सूचना करण्यास प्रारंभ केला आहे. प्रवाशांना केंद्रस्थानी मानून कंपनीने रचना बदलावी, असे मत अनेक हितचिंतकांनी व्यक्त केले आहे. स्वीकारणीय सूचनांवर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
आगामी सात दिवस महत्वाचे
‘आज गुरुवारी एअर इंडिया कंपनीचे पूर्ण हस्तांतर टाटा उद्योग समूहाकडे करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सात दिवस आमच्यासाठी अतिमहत्वाचे आहेत. या आठवडय़ात कंपनी आपली प्रतिमा परिवर्तित करण्यासाठी सर्व कष्ट घेणार आहे. आता आम्ही सराकरी नव्हे, तर खासगी क्षेत्रात आलो आहोत. याचे भान ठेवून प्रवाशांच्या हिताला सर्वतोपरी प्राधान्य दिले जाणार आहे, असे एअर इंडियाच्या नव्या व्यवस्थापनाने आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. या संदेशामुळे विमान प्रवाशांमध्येही कंपनीसंबंधी नवे कुतुहल जागृत झाले आहे.
महाराजा विसावला टाटांच्या खांद्यावर
- टाटा उद्योगसमूहाकडून स्वामित्वाबरोबर उत्तरदायित्वाचा स्वीकार
- कंपनीची सेवा सुधारण्यासाठी त्वरित सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार
- प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजनांना आकार देणार