ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांचे बुकींग होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर 15 एप्रिलला केंद्र सरकार कोणता निर्णय घेईल, त्यावर विमानाचे बुकींग कधीपासून सुरू करायचे ते ठरेल, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
दरम्यान, एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत सर्वच बुकिंग बंद केल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का? याची चिंता आता देशवासीयांना लागली आहे.