प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिका हा मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या महानगरपालिकेवर मराठी भाषिकांनी आजपर्यंत निर्विवाद आपले वर्चस्व राखले आहे. निवडून येणार याबाबत सक्षम असूनही केवळ मराठी मतांची विभागणी होऊ नये या एका कारणासाठी निवडणुकीतून एक पाऊल मागे घेतले आहे. याचाच विचार प्रत्येक प्रभागात होऊन एकच एक उमेदवार दिला जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माघार घेणे ही काही हार नसून हा मराठीसाठीचा त्याग आहे. त्यामुळे वेळ गेलेली नसून सर्व मराठी इच्छुकांनी एका वॉर्डमध्ये एकच मराठी उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी उपमहापौर व महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर यांनी केले आहे.
अद्यापही आपण एकच एक मराठी भाषिक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करीत आहोत ते प्रयत्न फळाला येतील अशी अपेक्षा आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी त्यासाठी उमेदवारांवर दबाव आणावा.