कडेगाव नगरपंचायतनिमित्ताने काँग्रेसला टोला
देवराष्ट्रे/प्रतिनिधी
महाविकासआघाडी म्हणुन एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो असतो तर कडेगाव नगरपंचायतमधील सत्ता गेली नसती असा टोला पालकमंत्री जयंत पाटील यांनी काॅग्रेसला दिला. ते देवराष्ट्रे येथे स्व. जी. डी. बापु लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून आमची प्रमाणिकपणे एकत्र काम करण्याची इच्छा आहे. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडी असती तर चित्र वेगळे दिसले असते.
नुकत्याच झालेल्या कडेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने अकरा जागी विजय मिळवत येथील काॅग्रेसची सत्ता ऊलथवुन टाकली आहे.तर काॅग्रेसला केवळ पाच जागावरच विजय मिळवता आला. तर राष्ट्रवादीने एक जागा मिळवत खाते खोलले आहे.