बेंगळूर : एकाच कुटुंबातील सहा जणांनी शेततळय़ात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यादगीर जिल्हय़ाच्या शहापूर तालुक्यातील दोरनहळ्ळी येथे सोमवारी ही घटना घडली. कर्जाला कंटाळून या कुटुंबाने जीवनयात्रा संपविली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. भीमराय सुरपूर (वय 45), शांतम्मा सुरपूर (वय 36), श्रीदेवी (वय 13), सुमित्रा (वय 12) शिवराज (वय 9) आणि लक्ष्मी (वय 4) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. याची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक आर. शामसुंदर नायक व अग्नीशामक दलाचे अधिकारी हनुमनगौडा पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. कर्जामुळेच भीमराय याने पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चौकशीनंतरच याविषयी स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Previous Articleजगप्रसिद्ध जोग फॉल्स पर्यटकांसाठी मुक्त
Next Article सक्रिय रुग्णसंख्या लाखाच्या खाली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.