2014 साली सातारा जिह्यातील कोणत्याही वशिल्याशिवाय पोलीस भरती झालेल्या चारशे पोलिसांनी चांगुलपणाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या आयुष्यात घेतला आणि काही चांगले घडविण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्याचा निर्धार केला. त्यातूनच लॉकडाऊनच्या काळात चार वषीय भाजलेल्या आणि पित्याने त्यागलेल्या चिमुरडय़ाला त्याच्या उपचारासाठी 76,500 रु.ची मदत या पोलिसांनी केली. समाजानेही उर्वरित सव्वा लाखांचे दान त्या मुलाच्या आईच्या हाती सोपवले. आता त्या मुलाच्या जीविताचे रक्षण झाले आहे. हे घडले कसे आणि त्यामागचा विचार काय हे जाणून घेणे समाजाच्या हितासाठी खूपच महत्त्वाचे आहे. सातारा जिह्यातील उंब्रज पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱया दत्तात्रय लवटे आणि त्यांच्या 400 पैकी अडीचशे पोलीस मित्रांनी एकत्र येत एक व्हाट्सअप ग्रुप केला आहे. हे सर्व पोलीस सातारा जिह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. समाजातील गरजू व्यक्तींना प्रत्यक्ष माहिती घेऊन मदत करण्याचे काम ते करत असतात. यापूर्वीही अनेक गरजूंना तीन ते पाच लाखापर्यंतची रक्कम मदत स्वरूपात दिली आहे. कराड तालुक्मयातील म्होप्रे गावचा चार वर्षांचा श्लोक आप्पा बुधावले हा वडिलांनी सोडून दिलेला चिमुकला आई जागृतीसोबत राहतो. 1 महिन्यापूर्वी खेळताना तो भाजून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कराडच्या चैतन्य बाल रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. मात्र टाळेबंदी असताना जायचे कोणाकडे आणि एवढी रक्कम उभी कशी करायची असा आईसमोर प्रश्न होता. तिची तगमग पाहून कोणीतरी सोशल मीडियावर मुलाच्या आणि तिच्या छायाचित्रासह माहिती प्रसारित केली. लवटे यांनी ती माहिती पाहून कराडच्या पोलीस मित्रांद्वारे खात्री केली. मदतीची खरोखरच गरज आहे असा संदेश त्यांनी ग्रुपवर टाकला. महिना अखेरीचे दिवस असतानाही दीडशे पोलिसांनी दिलेली रक्कम लवटे यांनी श्लोकच्या आईच्या हाती सोपवली. श्लोकची शस्त्रक्रिया झाली असून लवकरच तो सामान्य मुलांसारखा खेळू लागेल. पण या पोलिसांना अशी मदत का कराविशी वाटली याची माहिती जेव्हा स्थानिक पत्रकारांनी घेतली तेव्हा एक खूप महत्त्वाचे सत्य त्यांच्यासमोर आले. 2014 मध्ये सत्तांतर होण्यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातील अखेरची 50,000 पोलिसांची भरती केली होती. 2010 सालापासून जवळपास सव्वा लाख पोलीस आबांच्या कारकिर्दीत भरती झाले. पोलीस भरतीच काय राज्यसेवा परीक्षेतही होणारे घोटाळे, वशिला आणि त्यामुळे प्रत्येकवेळी जेलमध्ये जाणारे अधिकारी हे चित्र बदलण्यासाठी आर आर पाटील यांनी पारदर्शक, इन कॅमेरा भरती केली. परिणामी सर्वसामान्य घरातील क्षमतावान पोरापोरींची भरती झाली. पैसा नसल्याने आयुष्यात कधी आपण भरती होऊ असे वाटले नाही अशा सामान्यातील सामान्य कुटुंबातील मुले पोलीस झाली. सातारा जिह्यातील अशाच चारशे पोलिसांनी आबांच्या या पुण्याईची जाण राखायचे ठरवले आहे. आबांचे निधन होऊन आता सात वर्ष होत आली आहेत. पण ज्यावषी ते निवर्तले त्याच वषी पोलीस म्हणून सेवेत आलेले हे चारशेजण आपल्या परीने समाजातील गरजूंसाठी योगदान देत आहेत. आयुष्याच्या अखेरच्या वर्षांमध्ये त्यांनी बेरोजगारीचा प्रश्न प्रकर्षाने मंत्रिमंडळात मांडला. त्यापूर्वी बिन पैशाच्या योजना राबवून राज्यभरातील ग्रा.पं., युवक मंडळ यांच्याकडून स्वच्छता, आदर्श गाव अशा योजना राबवणारे आबा आता मुंबईत पोलिसाला घरे द्या, ग्रामीण महाराष्ट्रात पोलीस वसाहतींची योजना राबवा, अत्याधुनिक शस्त्र, वाहने द्या असे सांगता सांगता राज्यसेवा परीक्षा घ्या, पोलिसांची रिक्त पदे भरा अशी मागणी करताना अनेकांना रुचत नव्हते. पण आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर पक्षातील आणि मंत्रिमंडळातील वरि÷ांना त्यांनी निर्णयास भाग पाडले. सरकारी नोकरीत येणारा कोणीही संत, सज्जन राहत नाही. त्यामुळे पदे रिक्त असली तरी सरकारकडे पैसा नसताना भरायची कशाला असा एक मतप्रवाह होता. राज्यसेवा परीक्षेचे अनेक अधिकारी त्यावेळी तुरुंगात होते आणि या स्पर्धा परीक्षा देणाऱया महाराष्ट्रातील युवकांच्या गटांना भेटून आबा त्यांना लवकरच भरती होईल असा दिलासा देत होते. सरकार पारदर्शीपणे तुम्हाला नोकरी देईल. पण नोकरीत आल्यानंतर ही जाणीव तुम्हीही ठेवा. अधिकारी म्हणून बसला की दारात उभा असणाऱया माणसाचे दुःख विसरू नका, तुम्ही आणि तुमच्या पित्याने सुद्धा कधीतरी सरकारी कार्यालयातला अपमान आठवा आणि किमान स्वतः तसे वागणार नाही असे निश्चित करून सेवेत या. किमान नोकरी मिळाल्यानंतर आई बापाला वृद्धाश्रमात सोडणार नाही इतके तरी करा असे सांगताना आबा दिसत. त्यांच्या कारकीर्दीत खरोखरच अशा पद्धतीने लाखो युवकांची भरती झाली. हे युवक सेवेत आल्यानंतर काय करत आहे, हे अद्यापपर्यंत कळायला मार्ग नव्हता. मात्र श्लोक बुधावलेच्या निमित्ताने एकटय़ा सातारा जिह्यात असे चारशे पोलिस आहेत ज्यांना जाणीव आहे, नोकरीचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे म्हणून त्यांनी संघटितरित्या कार्य सुरू केले आहे. तर राज्यात नक्कीच हे चांगुलपणाचे पिक फोफावले आहे असा विश्वास वाटतो. महाराष्ट्राचे गृहखाते आज बदनाम झालेले असताना चारशे पोलीस शिपायांची एक फौज चांगुलपणा पेरत चालली आहे. चांगल्याचा बोलबाला व्हायला अर्थातच फार उशीर लागतो. त्याचे कौतुक होईल असेही नसते. पण सगळे काही हातून सुटले आहे असेच वाटावे अशा काळात अजूनही जगात चांगले घडत आहे याचा विश्वास वाढवणारी ही घटना आहे. संत तुकारामांनी चारशे वर्षांपूर्वी आपल्या अभंगातून त्याचा अनुभव दिला आहे. आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले, एका बीजापोटी, तरु कोटि कोटि जन्म घेती, सुमने फळे…. मानवाच्या जडणघडणीत त्याचे माणूसपण हे अशा सुमनांनी आणि फळांनी जन्म घेतच जिवंत ठेवले आहे…! त्या चांगुलपणाने आर आर पाटील या व्यक्तिमत्त्वालाही अमर केले आहे.
Previous Articleवादळी वाऱयामुळे वर्धन ऍग्रोचे गोडावून भुईसपाट
Next Article कोरोना रूग्णांना आता घरीच ऑक्सीजन मिळणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.