अंकुश कोकरे / सातारा
कासपठार परिसरातील अतिदुर्गम-डोंगरमाथ्यावरील एकीवमुरा ता. जावळी गावातील ग्रामस्थांची गेल्या दिडशे वर्षांपासून रस्त्याअभावी मैलोनमैल पायपीट सुरू असून अनेक विविध समस्येंशी संघर्ष करत ग्रामस्थ आदीवासीनं प्रमाणे खडतर आयुष्य जगत असून एकीवमुरा गावापर्यंत किमान कच्चा तरी रस्ता व्हावा अशी मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत.
सातारा-कास मार्गावरील एकीव फाटयापासुन महाबळेश्वर रस्त्यावरील एकीव गावच्या हद्दीतील एकीव गावापासुन डोंगरमाथ्यावर तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर डोंगरावरील, मुख्य रस्त्यापासुन दोन किलोमीटर डोंगरावर व कास पठारापासून दोन ते तीन किलोमीटर खाली अशाप्रकारे मधोमध अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावर पावणे दोनशे ते तीनशे लोकसंख्या असलेले एकीवमुरा गाव आहे. या गावात मुलभूत शासकीय सुविधाच मिळत नसल्याने डोक्यावरून किती वर्ष ओझी वाहायची म्हणुन अनेक नागरीकांनी गावची शेती पडीक बनवुन शहराची वाट धरली आहे.
या गावापर्यंत रस्ता होण्यासाठी ग्रामस्थ अनेक वर्ष लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत रस्ता होण्यासाठी स्वताच्या जमिनी विनामोबदला देऊ केल्या आहेत. वनविभागाचीही रस्ता होण्यासाठी परवानगी मिळवली आहे मात्र, केवळ निधी नसल्याचे कारण देऊन वेळकाढु पणाचे धोरण संबधीतांकडून अवलंबले जात आहे रसत्याविना गावात कोणत्याच शासकीय सोईसुविधा अदयाप पोहचल्या नाहीत आणि येत्या काळात त्या पोहचवायच्या तरी कशा ऐवढया वर्षात गावात साधा ग्रामपंचायतीकडून स्ट्रीट लाईटच दिवा बल पेटला नाही तेथे विकास किती पोहचला असणार असा सवाल उपस्थित होत आहे.
शेती हा मुख्य व्यवसाय असून वन्यपशूपक्ष्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत असून पशुपालन जोड व्यवसायात दूधाच्या किटल्या पाणी दळण जनावरांचे खुराक आदी सर्वच जिवनआवश्यक वस्तु डोक्यावर घेऊन मैलोन मैल डोंगरातील पायवाटेने पायपीट करावी लागत आहे. डोंगर चढउतार करण्यासाठी तासनंतास पायी चालावे लागत असून ग्रामस्थांना समवेत लहान मुलांदेखील याच पायवाटेने ऊन, वारा, पाऊसाशी संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. पावसाळ्यात या चिखलमय पायवाटेची मोठी घसरण होऊन कित्येक छोटेमोठे अपघात घडले आहेत. आजारी व्यक्तीला उपचारासाठी व अत्यावश्यक सेवेसाठी मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी डालग्याची अंबुलंन्स चौघांच्या खंदयावर घेऊन करावी लागते त्यामुळे या गावापर्यंत रस्ता होण्यासाठी नागरीकांना किती वर्ष संघर्ष करावा लागणार की लोकप्रतिनिधी व प्रशासन तात्कळ लक्ष घालुन या गावची समस्या सोडवणार हे पहावे लागेल.
कच्चा देखील रस्ता नसल्याने वाहतूक, दळणवळण पायीच करावी लागते. दीडशे वर्षाचा काळ उलटूनही ग्रामस्थांना रस्त्याअभावी अनेक समस्यांशी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे बक्षीसपत्र झाले असून रस्त्याचे काम व्हावे यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे . वेळप्रसंगी रस्त्याच्या कामास श्रमदान करण्यास आम्ही सर्व ग्रामस्थ तयार आहोत मात्र लोकप्रतिनिधी प्रशासन यांनी आमचा अंत पाहु नये
-नामदेव गोरे, मुंबई चाकरमानी, ग्रामस्थ एकीवमुरा
आमच्या गावाला रस्ता नसल्याकारणाने पावसात एखादया घराची पडझड झाल्यास त्याची डागडूजी करण्यासाठी मालाची तसेच उदरनिर्वाहाच्या सर्व साहित्याची डोकयावरून वाहतूक करताना मोठी दमछाक होते. आजारी व्यक्तीला डालग्यात घालून डोंगर उतरावा लागत आहे.आमच्या वस्तीत अदयाप एकही शासकीय योजनेतुन काम झालेले नाही येत्या काळात तरी होईल का मात्र येत्या काळात तरी होईल का आम्ही शासनाला सर्व कर वेळेत भरतो मात्र शासन आमच्यासाठी की आम्ही शासनासाठी हेच कळत नाही
–रामचंद्र गोरे, उपसरपंच, एकीवमुरा ता. जावळी