बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना सकारात्मकतेचा दर वाढत असल्याने, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी महामारीबद्दल तांत्रिक सल्लागार समिती (टीएसी) बरोबर झालेल्या बैठकीनंतर, महाराष्ट्र आणि केरळहून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी राज्यात आरटी-पीसीआर नकारात्मक प्रमाणपत्र सक्तीचे करणे आवश्यक आहे. तसेच नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे म्हंटले आहे.
शिवाय, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना असा इशारा दिला आहे की जोपर्यंत लोक स्वत:खबरदारी घेण्यास सुरवात करत नाहीत तोपर्यंत सरकार कधीही कठोर कारवाईचा विचार करेल. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
राज्यात कोरोना सकारात्मकतेच्या दरात वाढ झाल्याने, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी महामारीबद्दल तांत्रिक सल्लागार समिती (टीएसी) बरोबर झालेल्या बैठकीनंतर म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि केरळहून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी राज्यात आरटी-पीसीआर नकारात्मक प्रमाणपत्र सक्तीचे करणे आवश्यक आहे. तसेच नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
शिवाय, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना असा इशारा दिला आहे की जोपर्यंत लोक स्वत:खबरदारी घेण्यास सुरवात करत नाहीत तोपर्यंत सरकार पुढील कठोर कारवाईचा विचार करू शकेल.
विशेष म्हणजे सरकार नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाऊन विचारात घेत आहे की नाही, याविषयी बोलताना युडियुरप्पांनी या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. “पुढील निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आणखी एक आठवडा वाट पाहू,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी देशातील कोविड सकारात्मकतेच्या दराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान काय योजना आखत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग आम्ही आपला अंतिम निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. सोमवारी बैठकीनंतर येडियुरप्पा यांनी जाहीर केले की बेंगळूर, गुलबर्गा, बिदर, उडुपी आणि बेळगाव या जिल्ह्यांचा सरकारने आढावा घेतला असून इथे सकारात्मकतेचे प्रमाण वाढले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही लग्नासाठी, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी आम्ही ५०० लोकांच्या उपस्थितीवर बंधन घातले आहे, असे ते म्हणाले. सरकार संपूर्ण राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे कडक नियम परत आणेल आणि उल्लंघन करणाऱ्यांकडून २५० रुपये दंड वसूल करेल.
मुख्यत्र्यांनी कर्नाटकातील जनतेला मी विनंती करतो की जर त्यांना आणखी एक लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यू टाळायचा असेल तर त्यांनी सामाजिक अंतर कायम ठेवले पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी नेहमी मास्क घालावा हे त्यांच्या हाती आहे.” असे ते म्हणाले.