पंतप्रधान नरेंद्र मोदी यग्नांची 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने आपला 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा रविवारी साजरा केला आहे. प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यग्नांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यग्नापूर्वी त्यांनी लाल किल्याच्या प्राचीवरुन भारताचा तिरंगा ध्वज फडकाविला. त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या आरंभाच्या निमित्ताने 1 कोटी कोटी रुपयांची ‘गती शक्ती’ ही भव्य योजना सादर केली. यग्ना योजनेतून विविध पायाभूत विकास प्रकल्प साकारणार आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास,’ या मंत्रासह त्यांनी ‘सबका प्रयास’ हा नारा दिला. देशाने गेल्या सात वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी आपल्या संदेशात घेतला. तसेच कोरोनाच्या आव्हानात्मक काळात या विषाणूचा नायनाट करण्यग्नासाठी प्रयत्नशील असणाऱया ‘कोरोना योद्धय़ां’चा त्यांनी मनःपूर्वक गौरव केला. सर्व आव्हानांना पार करुन प्रगतीपथावर अग्रेसर होण्याची क्षमता देशाने अनेकदा सिद्ध केली आहे. यावेळीही देश यग्ना क्षमतेची पुनरावृत्ती करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतरही अनेक योजना
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आगामी 75 आठवडय़ांमध्ये साजरा केला जाणार आहे. यग्ना कालावधीत 75 वंदे मातरम रेल्वेगाडय़ांचा प्रारंभ होणार असून त्या देशाच्या विविध भागांना जोडणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्यापासून तेथे शांतता आणि प्रगतीचे नवे मार्ग मोकळे झाले आहेत. या भागाच्या विकासावर अधिक भर दिला जाणार आहे. मतदारसंघांचे पुनर्सीमांकन तेथे केले जात असून ते काम प्रगतीपथावर आहे. विकास आणि आर्थिक उन्नती ही केंद्र सरकारची उद्दिष्टय़े आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले.
आत्मनिर्भर भारताचे ध्येय
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ते स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंतच्या येत्या 25 वर्षांमध्ये भारत आपले ‘आत्मनिर्भर’ होण्याचे ध्येय पूर्ण करेल. आत्मनिर्भरतेचे महत्व आता सर्वांना पटले असून आपण आपल्या आवश्यकतांसाठी इतर देशांवर अवलंबून राहणे केवळ कमीपणाचे आहे असे नाही, तर हे परावलंबित्व घातकही आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. साहजिकच देशाच्या आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे त्यांनी निक्षून सांगितले.
14 ऑगस्ट हा फाळणी अत्याचार स्मृती दिन
देशाच्या स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करत असतानाच हे स्वातंत्र्य मिळत असताना देशाला फाळणीचा आघात सहन करावा लागला. लक्षावधी निरपराध लोकांवर फाळणीच्या काळात अनन्वित अत्याचार झाले. या निरपराध नागरीकांचे रक्त देश विसरु शकत नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येक वर्षी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिन म्हणून पाळण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली. फाळणीच्या काळात कोटय़वधी लोकांचे अतिशय दयनीय स्थितीत आणि हालअपेष्टांमध्ये स्थलांतर झाले. असंख्य स्त्रिया आणि मुले यांच्यावर शब्दांमध्ये न सांगता येण्यासारखे अत्याचार झाले. या सर्व घडामोडी देश विसरु शकत नाही. म्हणून 14 ऑगस्ट या दिन पाळण्यग्नात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.