वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतात पंतप्रधानपदासाठी एकच कार्यकाळ करण्याची मागणी प्रख्यात पण वादग्रस्त लेखिका अरुंधति रॉय यांनी केली आहे. देशात आता राजा-महाराजांचा काळ संपला आहे, आम्ही पंतप्रधानासाठी केवळ एकच कार्यकाळ इच्छितो असे त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया येथील घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
अरुंधति रॉय यांना मोदी सरकारविरोधी मानले जाते. भाजपला सत्तेवरून हटवावे लागेल, परस्परांच्या विरोधात लढणाऱया राजकीय पक्षांनी एकत्र येत भाजपला आव्हान द्यावे. फॅसिस्टवादाच्या विरोधात उत्तरप्रदेशात सर्व विरोधकांनी एकत्र यावे असे अरुंधति यांनी म्हटले आहे. ज्याप्रकारे सरकारने कृषी कायदे मागे घेतले, त्याचप्रकारे एनआरसी-सीएए देखील मागे घ्यावे लागणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.