शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पालकमंत्र्यांना फटकारले
जयंत पाटलांची योजना पैसे हाणायसाठीच..
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापूर येऊन एक महिना झाला. शेतकऱ्यांना अद्याप दमडीही मदत मिळलेली नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा मोर्चा काढू नका, असा सल्ला देणारे आतापर्यंत झोपले होते का? अशा शब्दात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना फटकारले आहे. आक्रोश मोर्चासाठी ते दसरा चौक येथे आले असता ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.
मंत्री जयंत पाटील यांची बोगद्याची कल्पना म्हणजे भांडवील खर्च असणाऱ्या मोठ्या योजना जाहीर करायच्या आणि पैसे हाणायचे अशीच आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले, मदतीचे धोरण अद्याप ठरलेले नाही असे मंत्री ओरडून सांगत आहेत. पण मदत पुनर्रवसनचे सचिव आसिम गुप्ता यांनी 2015 च्या शासन निर्णयानुसार मदत मिळणार आहे. जास्ती जास्त पाचशे कोटी लागतील. एक जबाबदार अधिकारी धोरण ठरल्याचे सांगत आहे. त्यामुळे मंत्री शुद्ध धुळफेक करत आहेत अशी टिका केली. महापुरावर कायमस्वरुपी तोडगा निघाल पाहिचे भंडवली खर्चा योजना प्रत्यक्षात येणार नाहीत. या केवळ कवी कल्पना आहेत. भिंत बांधणार असला तर शिवाजी फूल, जयंती नाला बंद करणार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.