बारा दिवसांतील कारवाई : मुख्य अभियंत्यांच्या दौऱयात थकबाकीमुळे अधिकारी धारेवर : कारवाई गतिमान करण्याचे संकेत
थकित ग्राहक 1 लाख 07 हजार 240 एकूण थकित रक्कम 55.57 कोटी
प्रतिनिधी / कणकवली:
महावितरणच्या कणकवली विभागात 52 हजार 620 ग्राहकांजवळ 28.48 कोटी व कुडाळ विभागात 54 हजार 620 ग्राहकांजवळ 27.08 कोटी मिळून जिल्हय़ाची एकूण 55.57 कोटी थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी शुक्रवार, शनिवार जिल्हय़ाचा धावता दौरा करीत थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंत्यांपासून ते शाखा अभियंत्यांपर्यंत सर्वांना धारेवर धरल्याचे समजते. मार्च महिन्यात गेल्या 12 दिवसांत जिल्हय़ातील 1062 जणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीज बिलाची थकबाकी न भरल्याने कणकवली विभागातील केवळ थकित असलेल्या 112 आणि कुडाळ विभागातील 516 थकित ग्राहकांची वीज 11 व 12 मार्चला तोडण्यात आली. मुख्य अभियंत्यांच्या दौऱयानंतर थकबाकी भरणा करण्याबाबत कार्यवाही न झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही गतिमान करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी सर्वच व्यवस्था बिघडली. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर अनेक वीज ग्राहकांनी फेब्रुवारी 2020 पासून वीज बिल भरणे बंद केले. यामुळे 31 मार्च 2020 पासून एकही रुपया न भरलेले सिंधुदुर्ग जिल्हय़ात 35 हजार 483 ग्राहक थकबाकीदार झाले. त्यांनी 28.47 कोटी रुपयांची रक्कम थकित ठेवली. महावितरण कंपनीने प्राधान्याने याच थकित ग्राहकांकडे बिल भरणा करण्याचा तगादा लावला आणि त्यापैकी 13 मार्चपर्यंत 14982 ग्राहकांकडे 10.91 कोटी रुपये येणे रक्कम शिल्लक राहिली आहे.
महावितरण कंपनी ग्राहकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत आहे. परंतु, केवळ काही ग्राहक बिल भरणा करण्याची टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे एकूण थकाबाकीचा बोजा महावितरण कंपनीला असहय़ होत चालला आहे. त्यामुळे आता अशा थकित ग्राहकांची वीज सुरू ठेवणे म्हणजे बिल भरणाऱया
ग्राहकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे नागरिकही आता महावितरणने थकबाकीदारांची वीज तोडण्यात विलंब करू नये, असे आवाहन करीत असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.
कणकवली विभागात 29 कोटी थकबाकी
महावितरणच्या कणकवली विभागातील कणकवली, देवगड, मालवण आणि वैभववाडी व आचरा हे उपविभाग मिळून विभागीय कार्यालयाची 29 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ‘माझे वीजबिल… माझी जबाबदारी’ या भावनेतून वीज ग्राहकांनी 31 मार्चपूर्वी थकित वीज बिले भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन या विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी केले आहे.
कणकवली विभागात 54 हजार थकबाकीदार
कणकवली विभागात एकूण 54 हजार 197 वीज बिल थकबाकीदार आहेत. यात खासगी घरगुती ग्राहकांसह वाणिज्य, औद्योगिक, कृषी पपंधारक, स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठा, सार्वजनिक क्षेत्रातील हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आदींचाही समावेश आहे. एकूण 54 हजार 197 थकबाकीदारांपैकी घरगुती, वाणिज्य, औद्योगिक ग्राहकांची 18 कोटी 51 लाखांची थकबाकी आहे. त्यातही घरगुती वीजकनेक्शन असलेल्या 4 हजार 340 वीज ग्राहकांकडे 10 कोटी 91 लाख रुपये थकीत आहेत. वाणिज्य वापराच्या 4 हजार 250 ग्राहकांजवळ 4 कोटी 60 लाख येणे बाकी आहे, तर 760 औद्योगिक ग्राहकांकडे 3 कोटी 2 लाख रुपये वीजबिल रक्कम थकित आहे. कृषी पंपधारक असलेल्या 2 हजार 900 ग्राहकांकडे एकूण 27 लाखांची थकबाकी आहे. 1 हजार 217 स्ट्रीटलाईट ग्राहकांकडून 6 कोटी 38 लाख येणे बाकी आहे. पाणीपुरवठा योजनांच्या 760 ग्राहकांचे 3 कोटी 2 लाख थकीत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आदी 922 ग्राहकांची 65 लाख रुपयांची वीजबिले थकित आहेत.
कणकवली विभागात केवळ पाच कोटीची वसुलीमार्च अखेर वीजबिलापोटी केवळ 5 कोटी 37 लाख रुपयांची वसुली कणकवली विभागाची झाली असून हा आकडा एकूण वीजबिल वसुली टार्गेटच्या केवळ 17 टक्के आहे. एकंदर सध्या वीज वितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून अपेक्षित वीजबिल वसुली न झाल्यास साहजिकच त्याचा परिणाम पावसाळय़ापूर्वीच्या आणि ऐन पावसाळय़ातील वीज वितरणच्या डागडुजीवर दिसणार आहे. ज्यांची 1 एप्रिल 2020 पासून वीजबिले थकित आहेत तसेच ज्या थकित ग्राहकांना मोबाईल मेसेजद्वारे वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे व त्यांनी वीजबिले भरलेली नाहीत, अशांवर नाईलाजास्तव वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करावी लागत आहे. सर्वांनी आपली थकित बिले 31 मार्चपूर्वी भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे. ज्यांना पूर्ण रक्कम भरणे शक्मय नसेल त्यांनी 31 मार्चपूर्वी टप्प्याटप्प्याने आम्ही वीज बिल आपल्याकडे जमा करू, असा अर्ज करून आपला वीजपुरवठा खंडित होण्यापासून टाळावा, असे आवाहन बाळासाहेब मोहिते यांनी केले आहे.