मुंबई
शेअर बाजारात एचईजी लिमिटेड कंपनीच्या समभागाने पाच वर्षाच्या कालावधीत उत्तम परतावा दिला असल्याचे दिसून आले आहे. कंपनीच्या समभागाने पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना 900 टक्के इतका भक्कम परतावा दिला आहे. कंपनीचा समभाग 21 डिसेंबर 2016 रोजी 152 रुपयांवर बाजारात व्यवहार करत होता. मंगळवारी या समभागाचा भाव मुंबई शेअर बाजारात 1524 रुपयांवर पोहोचला होता. ज्यांनी 5 वर्षापूर्वी या समभागात 1 लाख गुंतविले आहेत, त्यांना आज 10 लाख रुपये इतका परतावा मिळाला आहे.