बेळगाव / प्रतिनिधी
एज्युकेशन इंडियाच्या माध्यमातून रविवारी हॉटेल मेरिएट येथे विद्वत सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या ग्रामीण व मागास भागामध्ये शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी एज्युकेशन इंडिया ही संस्था कार्यरत आहे. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व कोरोनानंतर शाळांची परिस्थिती या विषयावर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नल पद्मिणी एच. सी. यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ब्रिगेडियर एस. के. लामा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी भरतेश संस्थेचे विनोद दोड्डण्णावर, बसवराज कोन्नूर यांच्यासह 160 हून अधिक शिक्षणतज्ञ, संचालक, प्राचार्य व इतर प्रशिक्षक उपस्थित होते. एज्युकेशन इंडियाचे सीईओ डॉ. मंजित जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.