ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यात मुंबई तर हॉटस्पॉट बनले आहे. मुंबईतील धारावी मध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता ‘एनआरएस’ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे अशी घोषणा आव्हाड यांनी केली. या संदर्भात ट्विटर वर त्यांनी माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून 1000 ते 5000 स्क्वेअर फूटांचं प्रथामिक आरोग्य केंद्र (मोफत एफएसआयच्या धर्तीवर) बांधण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. तसे आदेश मी पारित केले आहेत. असेेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलेे.