प्रतिनिधी /पणजी
स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून एनसीसी गोवातर्फे स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी महिन्याभरासाठी गोव्यातील समुद्रकिनाऱयाची स्वच्छतेबाबत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी एनसीसी कायमच तत्पर असते. एनसीसीतर्फे राष्ट्रीयस्तरावर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्याचा विचार करत आहे.
एनसीसी कॅडेटतर्फे नुकताच पुनीत सागर अभियानतंर्गत समुद्रकिनाऱयांची स्वच्छता करून स्थानिकांना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याबाबत संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमाची सांगता आज मंगळवार दि. 5 रोजी होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रकिनाऱयालगतचा प्लास्टिक कचरा साफ करणे, लोकांमध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याबाबत जागृती करणे आणि समुद्रातील प्रदूषण टाळण्यासाठी जास्ततः लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न.
सदर उपक्रम संपूर्ण वर्षभर सुरू राहील. 127 किनारी भागातील एनसीसी युनिटमधील 340000 कॅडेटस यात सहभागी होणार आहेत. गोव्यात सुमारे 3000 कॅडेट्स सहभागी झाले होते. आज मंगळवार दि. 5 रोजी मिरामार समुद्रकिनाऱयावर या उपक्रमाची सांगता होणार आहे. यात काही माजी एनसीसी कॅडेट्सना आमंत्रित करण्यात आले आहे.