प्रतिनिधी / बेळगाव
एपीएमसी मार्केटमधील गोंधळ काही केल्या संपताना दिसत नाही. सलग तिसऱया दिवशीही मार्केटमध्ये प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱयांना बसला आहे. योग्य नियोजन न केल्यामुळे मोठे परिश्रम घेऊन बाजारात आणलेला भाजीपाला शेतकऱयाला कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील आठवडय़ाभरापासून शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व बंद करण्यात आले आहे. नागरिकांना भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाकडून घरोघरी विक्री केला जात आहे. परंतु भाजीपाला उत्पादित करणारा शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
रविवारी पहाटेपासूनच एपीएमसीमध्ये भाजीपाल्याच्या गाडय़ा दाखल झाल्या. मागील दोन्ही दिवस भाज्यांचा लिलाव झाला नसल्यामुळे भाजीपाला मार्केटमध्येच पडून होता. त्यामुळे रविवारी तरी लिलाव होईल या आशेने शेतकऱयांनी भाजीपाला एपीएमसीमध्ये आणला. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सलग तिसऱया दिवशीही शेतकऱयांना सहन करावा लागला.
गोवा तसेच अन्य राज्यांमध्ये जाणारा भाजीपाला बंद करण्यात आला असल्याने या भाजीपाल्याचे करायचे काय? असा प्रश्न व्यापाऱयांसमोर आहे. शहरातही अत्यंत कमी प्रमाणात भाजीची विक्री केली जात आहे. त्यामुळे भाजीला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱयाला भाजीपाल्याच्या बियाणाचाही खर्च मिळत नाही. त्यामुळे हताश होऊन शेतकऱयांना एपीएमसीमधून माघारी फिरावे लागत आहे.