समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहण्याचे दिले आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसी अध्यक्ष पदासाठी युवराज कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. युवराज कदम आणि अलतगा ग्रामस्थांचे जुने नाते आहे. त्यामुळे त्यांची एपीएमसी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कोणतीही समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
ग्राम पंचायत सदस्य चेतक काब्ंाळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम एपीएमसी येथील त्यांच्या कक्षात झाला. यावेंळी अलतगा गावचे चेतक कांबळे, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडुम, उपाध्यक्ष संजय पाटील, नागेश धुडुम, बाळू चौगुले, नागेश हन्नुरकर, संजय आलोजी, पिराजी पावशे, अशोक घुग्रेटकर, पुंडलिक पाटील, गोपी पाटील, बाळू पाटील, आप्पा पावशे, गणपत सुतार, उमेश चौगुले, पुंडलिक कंग्राळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.