जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन : खासगी मार्केटही एपीएमसीच्या ताब्यात द्या
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसी मार्केट ही सरकारी संस्था आहे. असे असताना खासगी भाजीमार्केट काढून सरकारी संस्थेचे नुकसान करण्याचा प्रयत्न चालविला आहे. खासगी भाजीमार्केटमध्ये शेतकऱयांची फसवणूक होण्याची शक्मयता आहे. या दोन्ही मार्केटमुळे शेतकऱयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तेव्हा शेतकऱयांना वाचविण्यासाठी एपीएमसी वाचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हाधिकाऱयांनी तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून एपीएमसी मार्केटमध्ये शेतकरी आपला उत्पादित केलेला माल विक्री करत आहेत. एपीएमसी ही सरकारी संस्था आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आहे. मात्र खासगी मार्केटवर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱयांची फसवणूक होण्याची भीती अधिक आहे. वजन तसेच वेळेत शेतकऱयांचे बिल मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. तेव्हा त्यावरही सरकारचेच नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे. तेव्हा सरकारनेच ते मार्केटही एपीएमसीकडे सोपवावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या दोन्ही मार्केटमुळे शेतकऱयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खासगी मार्केटमुळे एपीएमसीवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सरकारचेच मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा याबाबत आताच गांभीर्याने घ्यावे आणि खासगी मार्केटही एपीएमसीच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंट्टी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, राघवेंद्र नाईक यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.