नवी दिल्ली
गेल्या एप्रिलमध्ये भारतातील विजेच्या वापरामध्ये साधारणपणे 41 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. विविध उद्योग आणि व्यवसाय सुरू असल्याने विजेच्या मागणीमध्ये एप्रिल महिन्यात चांगली वाढ दिसली आहे. एप्रिल महिन्यात एकाच दिवशी 132.20 गीगावॅट इतक्या सर्वाधिक विजेचा वापर करण्यात आला असल्याचे दिसून आले. तर याच तुलनेमध्ये एप्रिलमध्ये एकाच दिवशी 182.55 गीगावॅट विजेचा पुरवठा विक्रमी स्तरावर करण्यात आल्याचे दिसून आले.