कंपनी मंत्रालयाकडून आकडेवारी सादर
नवी दिल्ली
एप्रिल महिन्यात देशभरात एकूण 15,905 इतक्या कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच एप्रिल महिन्याच्या अंतिम क्षणापर्यंत सक्रिय एकूण कंपन्यांची संख्या वधारुन 14,51,401 इतकी झाली आहे.
कंपनी मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 30 एप्रिल 2022 पर्यंत कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत एकूण 23,33,958 कंपन्यांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये 8,29,269 कंपन्या बंद झाल्या आहेत. तर 7,021 कंपन्यांच्या विरोधात दिवाळखोरीमुळे कारवाई करण्यात येत आहे.
एप्रिलमधील सक्रिय कंपन्या
एप्रिल महिन्याच्या अंतिम कालावधीपर्यंत सक्रिय कंपन्यांची संख्या 14,51,401 राहिली. यामध्ये याच महिन्यात एकूण 15,905 कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. नवीन नेंदणीकृत भांडवल 2,316.52 कोटी रुपयांवर राहिले आहे.