ऊस उत्पादक शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
गळीत हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, अजूनही साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केले नाहीत. दरवषी ऊसदर जाहीर करण्यास विलंब होत आहे. याचबरोबर काही साखर कारखानदार एफआरपीपेक्षा कमी दर देत आहेत. तेव्हा तातडीने साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करून त्याबाबतचा फलक लावावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिह्यातील साखर कारखानदार केंद्र सरकारच्या आदेशानुसार ऊसदर देण्यास टाळाटाळ करत आहेत. केंद्र सरकारने साखरेचा उतारा 10 आहे त्या उसाला 2850 रुपये दर द्यावा, असा आदेश दिला आहे. त्यानंतर त्यापेक्षा अधिक साखरेचा उतारा असेल तर अधिक 285 रुपये प्रति टक्केवारीनुसार द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.
ऊस पाठविल्यानंतर 14 दिवसांमध्ये शेतकऱयांना ऊस बिल देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र एकही साखर कारखानदार त्या कायद्याचे पालन करत नाही. तेव्हा कायद्यानुसारच साखर कारखानदारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक साखर कारखान्यातील साखरेचा उतारा आणि वजन काटा तपासणीसाठी जिल्हाधिकाऱयांनी व साखर उपायुक्तांनी कमिटी नेमावी. त्यानुसार त्याची वारंवार तपासणी करावी, अशी मागणीदेखील निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सुरेश चौगुले, आप्पासाहेब कुरुंदवाडे, रामगौडा पाटील, विजय अकिवाटे, रविंद्र गाणगेर, धुळगौडा पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.