शेतकरी संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
शेतकऱयांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न देणाऱया साखर कारखान्याला गाळप परवाना देवू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने बाळासाहेब चव्हाण, राजेंद्र बर्गे-पाटील व शेतकऱयांनी केली आहे.
सहकारी व खासगी साखर कारखानदारी ज्यांची आहे त्यातील काहीजण सत्तेमध्ये आहेत. तर काही जण विरोधात आहेत. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीला मानधन वाढ करण्याबाबत विधीमंडळात एकमुखी ठराव घेण्यात येतो त्याला बहुमताने मंजुरी मिळते. परंतु शेतकऱयांना एफआरपीप्रमाणे उसाला दर मिळत नाही. दरवर्षी साखर कारखानदारी सुरू झाली की, ऊसाचा दराचा प्रश्ना मांडला जातो. पण शेतकऱयांना एफआरपीप्रमाणे दर मिळत नाही. शेतकऱयांचा आवाज दाबला जात आहे, अशी तक्रार शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आहे.
दरम्यान शेतकऱयांच्या उसाला सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे त्यांना दर द्यावा शेवटी शेतकरी जगला तर साखर कारखानदारी जगणार आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या प्रश्नाबाबत आम्ही जागरूक आहोत. अशी माहिती आपचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर यांनी दिली आहे. वेळप्रसंगी आम्ही आंदोलनातही सहभागी होवू अशीही त्यांनी माहिती दिली आहे.