प्रतिनिधी/ गोडोली
सातारा एमआयडीसी अनेक अडचणींना सामारे जात असताना तिला ऊर्जीत अवस्थेत आणण्यासाठी कोणी लक्ष देत नाही. उलट बंद असलेल्या कंपनीतून भंगार चोरून विकण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे परजिह्यातील भंगार व्यवसायिकांनी एमआयडीसी परिसरात बस्तान चांगलेच चर्चेत येऊ लागले आहे.ना घेताना ना देताना पावतीचं नाही, यामुळे चोरीचा माल कमी किंमतीत घेऊन ही मंडळी मालामाल होत आहे. आधीच डबघाईला आणि त्यात भंगार चोरटय़ांचा त्रास सुरू असून यावर एमआयडीसी प्रशासन, पोलीस, मास यांनी काही तर चाप बसविण्याची वेळ आली आहे. अन्यथा एमआयडीसीतील भंगार चोरून ती कंगाल करत चोरटे होत आहेत मालामाल झाले आहेत.
कोरोनाची धास्ती वाढत असताना सातारा एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी कामगारांना सुट्टी देत प्रादुभाव वाढू नये,यासाठी खबरदारी घेतली. मात्र याचा भंगार चोरटय़ांनी पुरेपुर फायदा उठवत बंद कंपन्यातून भंगार चोरण्याचा सपाटा लावला होता. पोलिसांनी अचानक या भंगार गोडावूनची पाहणी केल्यास संबंधित माल कोणाकडून घेतला अशी वरचेवर विचारणा केली पाहिजे.प्रत्यक्षात तसे होत नाही, विचारणारे कोणी नसल्याने चोरटय़ांकडून येणारा माल मोठय़ा प्रमाणावर असल्याने ही दुकानदारी बीनभोबाट जोरात सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर भंगार चोरीचे प्रमाण अधिक वाढणार आहे. चोरटय़ांकडून घेतलेला माल त्याच दिवशी विल्हेवाट लावला जात असल्याचे समजते.