अहिल्या परकाळे / कोल्हापूर
एमईच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधातील वाड्.मयीन चौर्य तपासण्याच्या सूचना युजीसीने दिल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शोधप्रबंध वाड्.मयीन चौर्य (प्लॅगॅरिझम) सॉफ्टवेअरमध्ये तपासून वाड्.मयीन चौर्य नसल्याचा अहवाल सादर केला आहे. पण गेल्या पाच महिन्यानंतर प्लॅगॅरिझम अहवाल तपासण्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली नव्हती. तब्बल पाच महिन्यानंतर महाविद्यालय पातळीवर डिपार्टमेंट ऍकॅडमी इंटीग्रेटी पॅनेल स्थापन केले आहे. महाविद्यालय पातळीवरील समितीने बैठक घेवून, अहवाल विद्यापीठाला पाठवायचा आहे. त्यानंतर विद्यापीठ पातळीवरील युनिव्हर्सिटी ऍकॅडमी इंटीग्रेटी पॅनेल अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे 6 फेब्रुवारी रोजी होणाऱया दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार का ? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत केआयटी, संजय घोडावत, तात्यासाहेब कोरे, भारती विद्यापीठासह विद्यापीठातही अभियांत्रिकीचे पदव्युत्तर (एमईचे) शिक्षण दिले जाते. यामध्ये मेकॅनिकल, मेकॅनिकल डिझाईन, इनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स आदी विषयांचा समावेश आहे. युजीसीच्या नियमानुसार शोधप्रबंधात 10 टक्केपेक्षा कमी वाड्.मयीन चौर्य चालू शकते. पण बऱयाच विद्यार्थ्यांच्या अहवालात 60 ते 70 टक्केपर्यंत वाड्.मयीन चौर्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधीत विद्यार्थ्यांना नव्याने शोधप्रबंध सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पुर्नतपासणी करून आपला शोधप्रबंध सादर केला. मात्र तब्बल पाच महिन्यानंतर प्लॅगॅरिझम अहवाल तपासण्यासाठी महाविद्यालय पातळीवर डिपार्टमेंट ऍकॅडमी इंटीग्रेटी पॅनेल स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीमध्ये कॉलेजच्या प्राध्यापकांसह विद्यापीठाचा एक सायन्टिफिक ऑफीसर, प्रत्येक कॉलेजमधील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समितीची बैठक घेवून जो अंतिम निर्णय होईल त्याचा अहवाल विद्यापीठातील परीक्षा विभागाला पाठवायचा आहे. या अहवालासंदर्भात विद्यापीठातील युनिव्हर्सिटी ऍकॅडमी इंटीग्रेटी पॅनेलची बैठक होईल. या बैठकीत महाविद्यालयाकडून आलेल्या अहवालाची पडताळणी केली जाईल. या पडताळणीनंतर अंतिम निर्णय घेवूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यामुळे 6 फेब्रुवारी 2020 मध्ये होणाऱया दीक्षांत समारंभात या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार का? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
पुन्हा नव्याने तयारी करावी लागणयाची विद्यार्थ्यांमध्ये भिती
एमईच्या विद्यार्थ्यांनी तोंडी परीक्षेनंतर वांड्.मयीन चौर्य (प्लॅगॅरिझम रिपोट) जमा केलाय त्या विद्यार्थ्यांसाठी डिपार्टमेंट ऍकॅडमी इंटिग्रेटी पॅनेल स्थापन केले आहे. कॉलेज पातळीवरील बैठकीमधील निर्णयाची शिफारस विद्यापीठाने मान्य न करता पुन्हा तोंडी परीक्षा आणि शोधप्रबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या तर पुन्हा विद्यार्थ्यांना नव्याने तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांना कॉलेजसह परीक्षा विभागात फेऱया माराव्या लागतील, अशी भिती नाव न सांगण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थी हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर निकाल जाहीर करणार
अभियांत्रिकी पदव्युतरच्या विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधातील वाड्.मयीन चौर्य अहवाल तपासण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर समिती नेमली आहे. महाविद्यालय पातळीवरील अहवाल सादर झाल्यानंतर त्वरीत विद्यापीठातील समितीची बैठक घेवून, विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यापीठाने विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोणातून काम सुरू केले आहे.
परीक्षा व मूल्यमापण मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे (शिवाजी विद्यापीठ)