नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कृषी विधेयकविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कृषी विधेयकाच्या मुद्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी “हमीभाव (एमएसपी) होता, आहे आणि राहणार’’ असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शेतकरी संघटनांना चर्चेचे आमंत्रण दिले आहे. यावर भारतीय शेतकरी युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देताना यासंबंधी ठोस कायदा करण्याची मागणी केली आहे. सरकार गोंधळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हमीभाव (एमएसपी) संपेल असे म्हटलेच नाही. आम्हाला केवळ हमीभावावर कायदा हवा आहे. कायदा बनल्याने देशातील शेतकऱयांना फायदा होईल. सध्या हमीभावावर कोणताही कायदा नाही आणि व्यापाऱयांकडून शेतकऱयांची लूट होत आहे, असे म्हणत टिकैत यांनी सरकारला उत्तर दिले आहे.