प्रतिनिधी / बेळगाव
केएलईएस डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीतर्फे एमबीएच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कमलाकर आचरेकर उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी स्वागत करून एमबीए विभागाची माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉ. आचरेकर म्हणाले, तुम्ही विविध प्रकारचे शिक्षण घेत आहात. त्या जोडीला संभाषण कौशल्य आणि नेतृत्व गुण विकसित केले पाहिजेत. त्यासाठी आपले शब्दभंडार वाढवा. कोणतेही क्षेत्र असो, संवाद कौशल्याला अधिक वाव आहे. प्राचार्य बसवराज कटगेरी यांनी अध्यक्षीय समारोप करताना आज विद्यार्थ्यांसमोर अनेक संधी आहेत. परंतु त्याचा उपयोग करून घेताना प्रभावी संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे, असे सांगितले. एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटच्या संधीसुद्धा अधिक आहेत.
प्रा. वैभव बाडगी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. रश्मी मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. प्रयाग गोखले यांनी आभार मानले.