पेडणे उपजिल्हाधिकारी तसेच पेडणे पोलीस स्थानकात एमव्हीआर कंपनी व अभियंते यांच्या विरोधात ऍड. जितेंद्र गावकर यांची तक्रार
पेडणे / प्रतिनिधी
अमेरे पोरस्कडे पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग किमान 70 ते 80 मीटर रस्त्या तेरेखोल नदीत वाहून गेल्याने रस्ता बांधकाम करणार एम व्ही आर कंपनी बाबत पेडणेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. एम व्ही आर कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा प्रत्यय आल्यानंतर आणि भविष्यात बाजूला असलेल्या रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला आहे .
13 रोजी पहाटे 3 वाजता राष्ट्रीय महामार्गाच्या तेरेखोल नदीच्या बाजूला बांधलेली संरक्षण भीत कोसळून 70 ते 80 मीटर लांबीचा रस्ता पाण्यात गेला . आणखी 200 मीटर रस्त्याला धोका निर्माण झाला आहे . शिवाय तेरेखोल नदीवर असलेल्या रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे . मोठय़ा प्रमाणात अमर्याद रेती उत्खन होत असल्याने या रस्त्याला व पुलाला धोका निर्माण झाला आहे .
या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरुवातीपासून वादग्रस्त ठरत होते . यावर वारंवार स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला , मात्र झोपी गेलेल्या सरकारला जाग आली नाही . सरकारने ठेकेदाराला पाठींबा दिला. शिवाय लोकप्रतिनिधीना बांधकाम करणारी कंपनी जुमानत नसल्याने आणि सरकारी यंञणा सुस्त असल्याने या राष्ट्रीय माहामार्गावर दुर्लक्ष केल्याने ठेकेदार मनमानी पणाने काम करत असे व त्याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला.
या रस्त्याला आणि पुलाला धोका आहे . याविषयी वारंवार वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या . मात्र सरकारने आणि ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष करून जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न केला . या रस्त्यावरून ज्या दिवसापासून या रस्त्याचेव काम सुरु झाले . त्या दिवसापासून डझनभर पेक्षा आपघात आपला प्राण गमवावे लागले. आणि आता तर चक्क तर रस्ताही वाहून गेलेला आहे . या घटनेमुळे ठेकेदारांच्या कामाचा दर्जा आणि सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग किती जागृत आहे हे दिसून येते .तेरेखोल नदीच्या बाजूने सातार्डा पूल ते न्हयबाग पोरस्कडे , वारखंड जंक्शन उगवे पर्यंत हा रस्ता नदीला टेकून जात आहे . नदीकाठी रस्ता करत असताना बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात आली होती . त्याही भिंतीला धोका निर्माण झाला. वाहून गेलेली संरक्षणभीतीची वरच्या बाजूला फक्त एक फुटच रुंद. त्यांमुळे हा रस्ता निकृष्ट बांधकामामुळे कोसळला.
नदीपाञ रुंद झाल्याने परिणाम
नदीत मोठय़ा प्रमाणात रेती उत्खन चालू असते त्यामुळे दोन्ही बाजूच्या नदीचे पात्र रुंदावत जावून नदीचे कठडे कोसळून पाणी शेतात बागायतीत घुसले . आता नदीचे पात्र राष्ट्रीय महामार्गाला गिळकृत करण्यासाठी पहिला धक्का 100 मीटर रस्ता कोसळून दाखवला . आता हळू हळू नदीकाठचा पूर्ण रस्ता नदी गिळकृत करण्यासाठी सज्ज्य झाली आहे . वाढत्या रेती उत्तखन सरकारच्या खाण भूगर्भ खात्याला रोखता आला नाही . परिणामी नदीचे पात्र रुंदावत चालले आणि रस्ता कोसळला . रस्ताचे काम करताना ठेकेदाराने मनमानी करत काम केले . मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सुचानांचेही काटेकोरपणे त्यांनी पालन केले नाही . मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी या रस्त्याची पाहणी करताना अभियत्याला ठेकेदाराना महत्वाच्या सूचना केल्या होत्या .त्याचे पालन केले नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत .
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
क्लॉलिटी कंट्रोल बोर्डतर्फे या कामाची पाहणी करुन संबधितावर कारवाई करण्याची वकिल जितेंद्र गावकर यांची पेडणे उपजिल्हाधिकारी व पोलिसात तक्रार
महाखाजन ते पञादेवी येथील राष्ट्रीय माहामार्गाचे बांधकाम एम व्ही आर कंपनीतृर्फे निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची क्लॉलिटी कंट्रोल बोर्डतर्फे पाहणी करुन व जे साहित्य वापरले त्याचे ऑडिट करुन बांधकाम कंपनी तसेच संबधीत अधिकारी व अभियंते यांची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी लेखी तक्रार देऊन पेडणे पोलीस तसेच पेडणे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
स्थानिक जागृत वकील जितेंद्र गावकर यांनी प्रतिक्रिया देताना रात्री 3 वाजता हा रस्ता कोसळला . ज्या रात्री हा प्रकार घडला आणि रस्ता पाण्यात गेला त्यावेळी कुणाला इजा झाली कि दुर्घटना घडली हे कुणाला माहित नाही . त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी ठेवण्यात आले . या रस्त्याचा विषय वारंवार आम्ही सरकारच्या नजरेस आणून दिला होता . काम खालच्या दर्ज्याचे आहे त्यावर काम करताना सुपरवायझरने देखारेख केली नाही . रस्ता बांधताना तात्रिक बाजू भक्कम न करता काम निकृष्ट दर्जाचे काम केले असा दावा केला , लोखंड वापरले नाही . केवळ काँक्रिट घालून भिंत उभारली . या रस्त्यावर स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचेही दुर्लक्ष झाले आहे . या रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेलेले आहे . पहाटे रस्ता कोसळल्यानंतर लगेच पेडणे पोलिसांना माहिती मिळताच या रस्त्यावर बेरिकेट्स तातडीने घाण्यात आल्याने दुर्घटना टळली असल्याचे वकिल
भ्रष्टाचाराचा कळस ः प्रवीण प्रभू
स्थानिक नागरिक प्रवीण प्रभू यांनी प्रतिक्रिया घटनास्थळी भेट देवून देताना या रस्ता म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस असल्याचे सांगितले . हा राष्ट्रीय माहामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे . जो पूर्वी बायपास रस्ता दाखवण्यात आला होता त्या रस्त्याला चालना द्यावी अशी मागणी प्रवीण प्रभू यांनी केली .
निकृष्ट दर्जाचे सिमेंट : व्यंकटेश नाईक
वारखंड बसस्टॉट नंतर अंदाजे 25 मीटर रस्त्याला लांबीची एक सेंटीमीटर रुंदीची भेग पडल्याची दिसत होती . आपण करासवाडा येथे एम .आर . कंपनीच्या अधिकाऱयांना याची जाणीव करून दिली होती . मात्र त्याकडे दुर्लक्ष केले . या रस्त्याचे काम करताना निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले . या कामाचा निषेध करण्यासाठी वेगळय़ा पद्धतीने उपक्रम राबवण्याची गरज आहे . या रस्त्यावर पत्रकारांनी वारंवार आवाज उठवला मात्र सरकारला जाग आली नाही अशी खंत वकील व्यंकटेश नाईक यांनी व्यक्त केली .
कुंपणच शेत खाते तर संरक्षण कोण करणार : सुबोध महाले
मोपा उपसरपंच सुबोध महाले यांनी प्रतिक्रिया देताना हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे . सरकारला वारंवार निवेदने देताना रस्त्याचे काम करताना अभियंत्यानी लक्ष द्यायला हवे असे सांगितले होते . मात्र सरकारला या रस्त्याचे पडून गेलेले नाही . जीवनाशी खेळ खेळणाऱया ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. जर कुंपणच शेत खायला लागले तर या रस्ताबाबत अशीच परिस्थिती होणार आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीव जाणार असे मत सुबोध महाले यांनी व्यक्त केले .
सरकारी अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने रस्ता कोसळलाः वकिल सीताराम परब
राष्ट्रीय माहामार्ग कामात सरकारचे अधिकारी व अभियंते यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच आतापर्यंत या रस्त्यावर अनेकाचे बळी गेले अनेक वेळा निवेदने देऊन सरकारला जाग आली नाही. माञ राष्ट्रीय महामार्गच कोसळून नदीपाञात जातो त्यावरुन या कामाचा दर्जा दिसून येतो . अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम या रस्ताचे एम व्ही आर कंपनीकडून करण्यात आले आहे.माञ सरकारचा वचक नसल्याने हा रस्ता कोसळला. याला जबाबदार सरकारी अभियंते आणि कंपनीचे अभियंते जबाबदार आहे असे वकिल सीताराम परब यांनी सांगितले .