ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विमा महामंडळाने पॉलिसी धारकांना मार्च आणि एप्रिल मधील हप्ते भरण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
ज्या विमा पॉलिसी धारकांचे हप्ते फेब्रुवारीत देय असून, त्यांच्या वाढीव मुदतीचा कार्यकाळ 22 मार्च नंतर संपत आहे. त्यांना 15 एप्रिल पर्यंत हे हप्ते भरता येणार आहेत. तसेच हप्ता भरताना एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी कोणते सेवा शुल्क आकारले जाणार नाही. एलआयसीचे ‘पे डायरेक्ट’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करूनही नागरिकांना विमा हप्ता भरता येणार आहे.
कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ विमादावा रक्कम
कोरोनामुळे दगावलेल्या 16 जणांच्या कुटुंबियांना एलआयसीकडून तातडीने विमादावा रक्कम देण्यात आली आहे. अशा प्रकरणांमधील दावे तात्काळ निकाली काढून संबंधितांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.